यवतमाळ जिल्ह्यात पाणी टंचाई दूर करणाऱ्या पाणीपुरवठा विभागातच निधी टंचाई

water_tankers
water_tankers

यवतमाळ : पाणीटंचाईच्या काळात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा निधी अद्याप मिळाला नसल्याने पाणीपुरवठा विभागात निधीची टंचाई आहे. यंदा जिल्ह्यात उन्हाळ्यात तब्बल चार लाख नागरिकांना टॅंकर व विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात आला.

कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा अनेक योजनांना कात्री लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. निधीअभावी आता कामांना 'ब्रेक' लागलेले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केवळ आरोग्याशी संबंधित कामे व बाबींना प्राधान्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. केवळ अत्यावश्‍यक कामे वगळता सर्व कामे थांबविण्यात आली आहेत.

निधीअभावी अनेक कामे अपूर्ण आहेत. जिल्ह्यात टंचाईच्या काळात टंचाई निवारणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा निधी मिळालेला नाही. जिल्ह्यात उन्हाळ्यात सव्वातीनशे गावांमधील जवळपास चार लाख नागरिकांना टॅंकर व विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात आला. त्यात १९ गावांमधील २३ हजार नागरिकांचा व २९६ गावांतील तीन लाख ८८ हजार नागरिकांचा समावेश होता.

टंचाई निवारणासाठी ६८२ गावांसाठी ७०६ उपाययोजना सुचविण्यात आलेल्या होत्या. यासाठी नऊ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलेला होता. त्यामधील ३९० गावांमध्ये ३५५ उपाययोजना टंचाईच्या काळात करण्यात आल्यात. त्यासाठी अपेक्षित खर्च सात कोटी रुपयांचा आहे. मात्र, अजूनही टंचाईची रक्कम मिळालेली नाही. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे यंदा अनेक योजना स्थगित करण्यात आलेल्या आहेत. त्यातच आता अनेक विभागांनी केलेल्या कामांचा निधीदेखील अडकण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

संचारबंदीचा परिणाम अनेक क्षेत्रांवर झालेला दिसून येत आहे. तसाच परिणाम शासकीय कामांवरदेखील झालेला आहे. शासनाकडे निधी नसल्याने आता अनेक विभागांना विविध अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्‍यतादेखील व्यक्त केली जात आहे. टंचाईच्या काळात नागरिकांना करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याचा दहा कोटी रुपयांचा निधी अजूनही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे नागरिकांची टंचाई दूर करणाऱ्या पाणीपुरवठा विभागासमोर निधीची टंचाई निर्माण झाली आहे.

आकडे बोलतात

  • टॅंकर-१९
  • गावे-१९
  • लोकसंख्या-२३,०१७
  • फेरीची संख्या-२६
  • खासगी विहिरी अधिग्रहण-३३१
  • गावे-२९६
  • लोकसंख्या-तीन लाख ८८ हजार ३१५

प्रस्ताव शासनाकडे
उन्हाळ्यात चार लाख नागरिकांची तहान भागविण्यात आली. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आलीत. मात्र, अजूनही शासनाकडून निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाला टंचाईच्या काळात खर्च झालेल्या निधीची प्रतीक्षा आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com