वीजबिल माफीसाठी जेलभरो आंदोलन करणार; माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1613387950392,"A":[{"A?":"I","A":54,"B":780.2425436461738,"D":125.75745635382623,"C":38.64183658872115,"a":{"B":{"A":{"A":"MAEV6fUobl0","B":1},"B":{"A":-3.55271
{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1613387950392,"A":[{"A?":"I","A":54,"B":780.2425436461738,"D":125.75745635382623,"C":38.64183658872115,"a":{"B":{"A":{"A":"MAEV6fUobl0","B":1},"B":{"A":-3.55271

महागाव (जि. यवतमाळ) : वीजबिल माफीसाठी जेलभरो आंदोलन करणार, असा इशारा माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. ते भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनानिमित्त महागाव येथे आले होते. त्यानंतर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते.

ऑटोवाले सरकार चार लाख शेतकऱ्यांचे लाईन बिल कापणार असून याला विरोध म्हणून जेलभरो आंदोलन भारतीय जनता पार्टी यांच्या नेतृत्वात लवकरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात येईल, असे इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. 

तसेच त्यांनी तिन-तिघाडे सरकार म्हणून टीका करीत हे सरकार केवळ अवैध धंद्याकडे जास्त लक्ष देत असून शेती व शेतकऱ्यांच्या समस्या दुर्लक्षित करीत असल्याचा आरोप केला. वाळूतस्करी, गिट्टी व अवैध दारू यांच्याकडे शासनाचे लक्ष असल्याचे ते म्हणाले. विकासकामांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेव ससाने, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, तालुकाध्यक्ष दीपक आडे, विलास काव्हाणे, विलास शेबे, विशाल सुरेश, नरवाडे, नंदू गिरी, गजानन जंगले, संतोष पवार, बिरबल मुळे, संजय पाटे, योगेश वाजपेयी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com