तुम्हीच सांगा कसं जगायचं? कष्टकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर

workers.
workers.

यवतमाळ : मार्च महिन्यात आलेल्या कोरोना विषाणूची साखळी तोडण्यात अजूनही यश आले नाही. अनलॉकडाउन नंतर काही तासांसाठी बाजारपेठ उघडण्यासह इतर बाबींसाठी मुभा देण्यात आली. जनजीवन अजून पूर्वपदावर आलेले नाही. कष्टकरी वर्गांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न अधिक गंभीर बनला आहे. म्हणून आता "तुम्हीच सांगा, जगायचं कसं', असा प्रश्‍न विचारला जात आहे.

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन हे प्रभावी औषध मानले जात आहे. मार्च महिन्यात दीर्घ कालावधीसाठी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला होता. "अनलॉक'नंतर काही दिवस मुभा मिळाली. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जुलै महिन्याच्या अखेरीस आठवडाभर लॉकडाउन पाळण्यात आला. पूर्णवेळ हाताला काम नसल्याने कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. मार्च ते मे या महिन्यांत पाळण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे कष्टकरीवर्गाला घरीच बसून राहावे लागले. सामाजिक संस्थांनी आठवडाभर पुरेल इतकी धान्यकीट दिली. त्याचा पाहिजे तसा दिलासा अनेकांना मिळाला नाही. धान्यकीट वाटपाचा इव्हेंट सामाजिक संस्थांकडून करण्यात आला. किती दिवस घरात बसून राहायचे, या विचाराने अनेकांना चिंतेने घेरले.

अखेर लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यावर काही प्रमाणात हाताला काम मिळाले. त्यातही अनियमितता असल्याने मजुरांच्या हाती पैसा नाही. दुकानात काम करणाऱ्या कामगारांना अडीच महिने घरीच बसून राहावे लागले होते. व्यवसाय नसल्याचे सांगून दुकानमालकांनी त्यांच्या हातात काहीच रक्कम दिली. बाजारपेठ उघडल्यावर काहीच तासांची मुभा देण्यात आली. त्याचाही फटका दुकानात काम करणाऱ्या हजारो कामगारांना बसला. काहींना तासाप्रमाणे रोज देण्यात आला. तर जुन्या कामगारांना अर्ध्या दिवसाचा रोज देण्यात आला. या पैशांत आम्ही करायचे तरी काय आणि शहरातील महागडा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्‍न त्यांच्याकडून विचारला जात आहे. कोरोनापेक्षा आता लॉकडाउनची जास्त भीती वाटते, अशी प्रतिक्रिया कामगारांकडून व्यक्त होत आहे.

सविस्तर वाचा - भिक्षेकरी झाले हायटेक; सोशल मीडिया व ऑनलाईन पेमेंट ॲप वापरणाऱ्यांना करतात टर्गेट, वाचा संपूर्ण प्रकार

अर्ध्या दिवसाचा रोज
मी दहा वर्षांपासून यवतमाळ शहरातील एका दुकानात काम करतो. जुना कर्मचारी असल्याने मालकाने लॉकडाउन कालावधीतील पगार दिला. आता अर्ध्या दिवसाचा रोज मिळत आहे. माझा खर्च भागवायचा की घरी पैसे पाठवायचे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
कुंदन, कामगार, यवतमाळ.

कामगार, काय म्हणतात
हाताला काम मिळेल, म्हणून आम्ही गाव सोडून यवतमाळात आलोत. दुकान उघडायला मुभा मिळताच आनंद झाला. गाडी रुळावर येण्यापूर्वीच पुन्हा घसरली. मालकही व्यवसाय होत नाही, असे म्हणत हात वर करीत आहेत. किरायाच्या खोलीचा खर्च, मुलांचे शिक्षण, आजारपण आणि त्यातच सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत. कोरोना आला आणि आमचे जगणे कठीण केले, असे मत महादेव, उमेश, गजानन यांनी "सकाळ'जवळ व्यक्त केले.

संपादन - स्वाती हुद्दार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com