

Yashomati Thakur
ESakal
नीट आणि सीबीएसई परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेऊन अभ्यास करतात, मात्र पेपरफुटीच्या घटनांमुळे त्यांच्या परिश्रमांवर पाणी फिरत आहे. पेपरफुटी प्रकरणी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी केवळ बदल्या केल्या जात आहेत.