रायगड जिल्ह्यात शिवसेना–भाजप युतीवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. 'शिवसेनेचा भाजपवर भरवसा नाही का?' असा थेट सवाल आता रायगडात उपस्थित केला जात आहे. याला कारण ठरलं आहे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचं ठाम आणि परखड वक्तव्य. रायगडमध्ये बोलताना भरत गोगावले म्हणाले की, भाजप नेमकी कधी आणि कुणाशी युती करेल, याचा काहीही भरवसा देता येत नाही. आमच्याशी चर्चा करायची आणि युती मात्र दुसऱ्याशी करायची, असा अनुभव वारंवार येतो, असा आरोप त्यांनी केला. या वक्तव्यामुळे दक्षिण रायगडातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, शिवसेना आता ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत जाण्याचे संकेत देत आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.