धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र अद्याप आरक्षण न मिळाल्याने धनगर समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. धनगर नेते दीपक बोऱ्हाडे यांनी सरकारला थेट सवाल करत, 'आरक्षण देऊ म्हटलं होतं, मग आता क्या हुआ तेरा वादा?' असा प्रश्न उपस्थित केला आहे. आरक्षण मिळालं नाही, तर मत नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २१ जानेवारीला राज्यभरातील धनगर बांधवांचा भव्य मोर्चा मुंबईत धडकणार असल्याची घोषणा बोऱ्हाडे यांनी केली. सरकारने लवकरात लवकर धनगर समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी आला असून, सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.