लातूर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषतः रेनापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. रेनापुर तालुक्यातील रेना नदीला पूर आला असून शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी नदीच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. गरसुळी गावातील शेतकरी सुरेश चव्हाण यांच्या पाच एकर क्षेत्रातील काढून ठेवलेले सोयाबीनचे ढीग पाण्यात गेल्याने त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. 'सरकारने मदत जाहीर केली, पण अद्याप एक रुपयाही हातात आलेला नाही. दिवाळी अंधारात गेली आणि आता काढलेलं पीकही पाण्यात गेलं… जगायचं तरी कसं?' अशा शब्दांत चव्हाण यांनी संताप व्यक्त करत टाहो फोडला. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा तातडीने करून योग्य ती मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.