राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे ६५ लाख हेक्टरवरी पिकांचं नुकसान झालं. अनेक ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या, शेतकरी मृत पावले, जनावरं दगावली, घरामध्ये पाणी शिरलं, अनेकांचे संसार वाहून गेले; त्यामुळे शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागला. साधारण ५० लाख शेतकरी बाधित झाले आहेत. या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. मंगळवारी, (दि. ७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकमध्येही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. कर्नाटक सरकारने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस मदत जाहीर केली आहे. कर्नाटकच्या तुलनेत महाराष्ट्राने नेमकी किती मदत केली, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.