Nandurbar: डिजिटलच्या गप्पा मारणाऱ्या सरकारनं दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेकडे फिरवली पाठ | Sakal News

Nandurbar News: पावसाळ्यात दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेला फाटलेल्या ताडपत्रीचा आधार; नंदुरबार जिल्ह्यातील बारी सुरगस जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात..

डिजिटल इंडिया, स्मार्ट क्लासरूम, गुणवत्तापूर्ण शिक्षण यावर गप्पा झोडणाऱ्या शासनाने प्रत्यक्षात दुर्गम भागातील शाळांकडे पाठ फिरवलेली दिसते. नंदुरबार जिल्ह्यातील बारी सुरगस या सातपुड्याच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेची स्थिती त्याचे जिवंत उदाहरण आहे. या शाळेत केवळ ४६ विद्यार्थी शिकत असले, तरी त्यांचे आयुष्य अक्षरशः धोक्यात आहे. सततच्या पावसामुळे शाळेच्या इमारतीची भिंत कोसळली आहे, तर छतासाठी ताडपत्री लावण्यात आली आहे. तीही अनेक ठिकाणी फाटलेली आहे. त्यामुळे पावसाचं पाणी सरळ वर्गखोल्यांत शिरतंय, आणि विद्यार्थ्यांना पाण्यात उभं राहून शिक्षण घ्यावं लागतंय. गंमत म्हणजे ही अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून आहे. याकडे प्रशासनाने वारंवार लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या जीवाशी शिक्षण विभाग खेळत आहे, असा संताप स्थानिकांमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com