भाजपचा स्वभाव मित्रपक्षांचा वापर करून नंतर त्यांचा राजकीय घात करण्याचा आहे, असा घणाघाती आरोप सपकाळ यांनी केला आहे. प्रत्येक निवडणुकीत आधी मित्रपक्षांना सोबत घेऊन सत्ता मिळवायची आणि नंतर त्यांना संपवायचं, ही भाजपची ठरलेली रणनीती असल्याचं ते म्हणाले. या निवडणुकीत भाजपला मिळालेलं यश हे भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिंदे गटाच्या शिवसेनेसाठी धोक्याची घंटा असल्याचा इशाराही सपकाळ यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस हे जल्लादाच्या भूमिकेत उतरले असून मित्रपक्षांना संपवण्यासाठीच ते पुढे सरसावले आहेत, असा खळबळजनक दावा करत सपकाळ यांनी महायुतीतील अंतर्गत संघर्षावर बोट ठेवलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.