पुणे - भ्रष्टाचार, खोट्या नोटा, दहशदवाद, हवालाकांडातून देशाला सावरण्यासाठी ५०० व १००० रुपयांच्या नोटा केंद्र सरकारने मंगळवारी (ता. ८) मध्यरात्रीपासून चलनातून बाद केल्याच्या निर्णयाचे स्वागत कृषीसह संलग्न क्षेत्रातूनही करण्यात आले; मात्र बहुतांश ग्रामीण भागातील व्यवहार बुधवारी (ता. ९) पूर्णत: ठप्प झाले. जे काही व्यवहार झाले, त्या ठिकाणी गोंधळाची, तणावाची आणि काही ठिकाणी सामोपचाराची स्थिती दिसून आली. विशेषत: सध्या खरीप शेतमालामुळे गजबजलेल्या बाजार समित्यांत शेतकऱ्यांची आणि ग्राहकांअभावी किरकोळ व्यापाऱ्यांची चांगलीच गोची झाली. याशिवाय पीकविमा भरण्याची आज (ता. १०) शेवटची मुदत असल्याने शेतकऱ्यांना विमा योजनेपासून मुकावे लागण्याचे चित्र दिसते आहे.
निर्णयाचे परिणाम...
बॅंक; सोसायट्या कामकाज थंडावले
शेतीविषयक किटकनाशके, खते उधारीवर..
खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद
- विश्वास कोळी, कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर
विहिरीवरील पंप बंद पडला आहे. दुरुस्तीसाठी पैशाची गरज आहे. त्यामुळे वाहनातून सोयाबीन विक्रीस आणले परंतु व्यापारी तीन दिवसानी पैसे देणार आहेत. पंप दुरुस्ती रखडली. पेरणीसाठी रान ओलावण्याचे कामदेखील लांबवावे लागले. वाहनाचे भाडे देण्यास पैसे नाहीत.
- माणिक घुले, पान्हेरा (ता. परभणी)
निर्णय स्वागतार्ह आहेच. सरकार पुन्हा नव्याने पाचशे, हजाराच्या नोटा बाजारात आणणार असल्याने त्यावर मार्ग निघेल. रोज बाजारात माल नेणाऱ्या व त्यावर प्रपंच चालविणाऱ्या शेतकऱ्यांना काही दिवस तरी त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
- राजाराम सांगळे, संचालक- अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटना.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.