शिवभोजन थाळी केंद्रातील ‘सेवा’ कागदावरच!

शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांचा शिवसेनेवर हल्लाबोल
शिवभोजन थाळी केंद्रातील ‘सेवा’ कागदावरच
शिवभोजन थाळी केंद्रातील ‘सेवा’ कागदावरचsakal

अकोला : शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी शिवसेनेवर(Shiv sena) हल्लाबोल करीत शिवभोजान थाळी (Shivbhojan thali) केंद्रातील सेवेचा उद्देश कागदावरच राहिल्याचा आरोप करीत, या केंद्राच्या माध्यमातून राज्यभर झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्रभर शिवभोजन थाळी केंद्र सरकारच्या मानधनावर उघडण्यात आले. प्रत्येक शहरात सर्कल तालुका, जिल्हा स्तरावर शिवभोजन थाळी केंद्र उघडण्यात आले. याचा मुख्य हेतू हा गोरगरीब जनतेला कामासाठी शहराच्या ठिकाणी आल्यानंतर पोटभर जेवन मिळावे हा होता. दोन वेळच्या जेवणाची सोय ही अगदी अल्प दरात उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश होता. परंतु सरकारच्या या उद्देशाला केराची टोपली दाखवत जास्तीत जास्त शिवसेनेच्या पदाधिकारी यांना मागेल त्याला या केंद्राचे परवाने देण्यात आले.

शिवभोजन थाळी केंद्रातील ‘सेवा’ कागदावरच
मालेगाव येथे सराफा व्यावसाईकावर गोळीबार; एकाचा मृत्यू, एक गंभीर

याचा परिणाम असा झाला की लोकांना चांगले उत्तम दर्जाचे जेवण फक्त सुरुवातीच्या काळात देण्यात आले. नंतर फक्त ही शिवभोजन थाळी कागदावरच राहिली, असा आरोप संदीप पाटील यांनी केला आहे. ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रभर असल्याचा दावाही त्यांनी केला. शिवभोजन थाळीचे जे संचालक आहेत त्यांनीच आपली आर्थिक बाजू बळकट केली आणि शिवभोजन थाळी राहली ती कागदावर, असा आरोप पाटील यांनी केला.

छत्रपतीच्या नावावर जनतेला धरले वेठीस!

एकीकडे छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर लोकांची मत घ्यायची आणि त्यांच्या नावावर मात्र जनतेला वेठीस धरायचे ही किती लाजिरवाणी बाब, असा शब्दात संदीप पाटील यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. ज्या राजाने आपल्या प्रजेसाठी स्वतःचे सर्व काही दिले, आज त्यांच्याच राज्यात अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे, या पेक्षा मोठी शोकांतिका कुठली? अशा प्रकारे खोटी कामे करणाऱ्या व भ्रष्टचार करणाऱ्या लोकांना छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देखील घेण्याचा अधिकार नाही, म्हणून अख्या महाराष्ट्रभर ज्या-ज्या ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्रामध्ये भ्रष्टाचार उघडकीस येईल, त्या-त्या ठिकाणी केंद्र संचालकांना व दोषींना तत्काळ अटक करून कठोर शासन करावे, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com