दीडशे लाख क्विंटल कापूस शिल्लक

cotton
cotton

जळगाव - देशात आजघडीला सुमारे १५० लाख क्विंटल कापूस (३० लाख गाठी) शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. जानेवारीनंतर कापूस दरात फारशी वाढ झालेली नाही. तीन महिन्यांत दर क्विंटलमागे ४०० रुपयांनी घसरल्याने कापूस उत्पादकांचे सुमारे ६०० कोटींचे नुकसान झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

सरकीच्या दरांवर दबाव राहिला. याच वेळी सरकीचे दर नोव्हेंबर २०१७ नंतर घसरतच राहिले. एप्रिल २०१८ मध्ये सरकीचे दर १४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. परिणामी कापूस उत्पादकांना अपेक्षित दर मिळू शकले नाहीत व बाजारातील दरांवरचा दबाव कायम राहिला. यातच मागील आठ दिवसांत सरकीचे दर क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढले आहेत. त्याचा सर्वंकष लाभ मात्र कापूस उत्पादकांना मिळू शकत नाही. कारण सुमारे ३४० लाख गाठींच्या कापसाची आवक बाजारात झाली आहे. अर्थातच एवढा कापूस व्यापारी, खरेदीदारांनी घेऊन त्यापासून रुई तयार केली आहे. 

देशात अद्याप सुमारे १५० लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे पडून आहे. पूर्वी ३६२ लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज होता. आता ३७० लाख गाठींचे उत्पादन होईल, असे संकेत आहेत. सरकीचे उत्पादन बऱ्यापैकी आहे. सरकीच्या दरात किंचीत वाढ झाली असून, यामुळे दर स्थिर राहतील. 
- अनिल सोमाणी, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

मॉन्सून नव्या हंगामात चांगला बरसेल, असे संकेत आल्यानंतर बाजारात गाठींची खरेदी काहीशी कमी झाली आहे. पण कापूस दर स्थिर आहेत. जानेवारीनंतर सरकीचे दर घसरल्याने कापूस उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. 
- दिनेश हेगडे, कापूस निर्यातदार, मुंबई

निर्यात वेगात
कापसाची निर्यात सुरू असून, देशातून आतापर्यंत सुमारे ६० लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) निर्यात झाली आहे. डॉलर वधारल्याने आयातीवर परिणाम झाला असून, सुमारे २० लाख गाठींची आयात अपेक्षित आहे. तर आणखी सहा ते सात लाख गाठींची निर्यात देशातून होईल, असे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com