चीनला होणाऱ्या कोळंबी निर्यातीला फटका; ‘आयसीआरए’ची माहिती

Shrimp
Shrimp

नवी दिल्ली - चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे येथील महत्वाचे बाजार बंद आहेत. त्यामुळे देशातून चीनला होणाऱ्या कोळंबी निर्यातीला फटका बसला आहे. चीनमधून असणारी मागणी घटणार आहे, अशी माहिती ‘आयसीआरए’ने दिली.  

भारत हा समुद्री उत्पादन निर्यात करणारा महत्त्वाचा देश आहे. विशेषतः कोळंबी निर्यात मोठ्या प्रमाणात होते. अमेरिकेनंतर चीन हा भारतीय कोळंबीचा सर्वांत मोठा ग्राहक आहे. २०१९ मध्ये अमेरिकेने ६ लाख ९८ हजार टन आयात केली होती, तर चीनने ६ लाख ५० हजार टन समुद्री उत्पादनांची आयात केली होती. 

‘आयसीआरए’ने प्रसिध्द केलेल्या अहवालात म्हटले आहे, की कोळंबी निर्यात करणाऱ्या ज्या कंपन्या चीनच्या निर्यातीवर सर्वाधिक अवलंबून असतात त्यांना लगेच मोठा फटका बसत आहे आणि भविष्यात आणखी फटका बसेल. चीनमधून कोळंबीला उठाव न मिळाल्यास जागतिक बाजारात मालाचा पुरवठा वाढून दरावर परिणाम होईल. अतिरिक्त कोळंबी पुरवठ्यामुळे निर्यातदारांचे अधीक नुकसान होईल. 

‘जागतिक बाजारात कोळंबील पुरवठा येणाऱ्या काळात वाढण्याची शक्यता आहे. पुरवठा वाढल्यानंतर सध्या मिळत असलेल्या दरात मोठी घसरण होईल. चीनमध्ये कोरोना विषाणुचा कहर सुरु झाल्यानंतर इक्वेडॉरमध्यून आयात झालेल्या कोळंबीचे दर कमी होण्यास प्रारंभ झाला आहे. इक्वेडॉर हे समुद्रीउत्पादन निर्यात करणारा महत्त्वाचे देश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com