
श्रीरामपूर : उत्तर नगर भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी दिनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात देसाई यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.