राज्यातील पाळीव संघटना कारखानदारांच्या सोईसाठी - रघुनाथदादा पाटील

रघुनाथदादा पाटील
रघुनाथदादा पाटीलesakal

श्रीरामपूर, (जि. अहमदनगर) : राज्यभरात आज अनेक पाळीव संघटना निर्माण झाल्या असून एफआरपी घेतल्याशिवाय सोडणार नाही अशी मागणी करणाऱ्या पाळीव संघटना साखर कारखानदारांच्या सोईसाठी तयार केल्या आहे. एफआरपीच्या वर ऊसाचे दर जावू द्यायचे नाही. असा कारखानदार आणि पाळीव संघटनाचा गुप्त करार झाला आहे. त्यामुळे ऊसाचा भाव काय द्यायचा, काय घ्यायचा ते आम्ही ठरवु, सरकारने केवळ साखर कारखाना उभारण्यासाठी लागु केलेली अंतराची अट काढण्याची मागणी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.

कारखानदारांच्या सोईसाठी अंतराची अट

येथील पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी रघुनाथदादा पाटील म्हणाले, ज्या-ज्या ठिकाणी ऊसाचे उत्पादन केले जाते. त्या-त्या ठिकाणी नव्याने साखर कारखाने उभारण्यास सरकारने परवानगी द्यावी. सर्व साखर कारखानदारांच्या भुमिका शेतकरीहीत विरोधी आहे. निवडणुका लढविण्यासाठी साखर सम्राट कारखान्याच्या माध्यमातुन पैसा उभा करतात.

रघुनाथदादा पाटील
Sakal Survey : निवडणुका झाल्यास सर्वात मोठा विजयी पक्ष कोणता?

शेतकऱ्यांना सध्या ऊसाच्या दरापेक्षा ऊस तुटून जाणे महत्वाचे वाटु लागले आहे. ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यावर अवलंबुन राहीला पाहिजे असे धोरण सरकारने तयार केले आहे. कारखानदारांच्या सोईसाठी अंतराची अट घातली आहे. ती काढुन टाकणे अंत्यत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरातच्या धर्तीवर राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार रुपये प्रति क्विंटल दराने भाव द्यावा. केंद्र सरकारने १२ लाख टन सोयाबीन पेंड आयात केल्याने सोयाबीनेचे दर १२ हजारांहुन सहा हजार रुपयांवर कोसळले. त्यास सरकार जबाबदार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तसेच जगभरातील कापसाचे उत्पादन घटल्याने यंदा कापसाचे दर चांगले आहे. त्यात सरकारचे काहीही योगदान नसल्याचे रघुनाथदादा पाटील यांनी स्पष्ट केले. युद्धाच्या काळात अन्नधान्य कमी पडु नये. म्हणुन परदेशातील सरकार शेतीसाठी भरीव अनुदान देते. मात्र आपले सरकार निर्यातबंदी घालुन शेतकऱ्यांचे नुकसान करते. तसेच शेतमालाची दरवाढ झाल्यास आयात करुन शेतकरी तोट्यात ठेवण्याचा सरकारचा डाव असल्यााचे त्यांनी सांगितले.

भाजपाच्या नेते मंडळीच्या बुद्धीचे दिवाळे निघाले

दिल्लीतील शेतकरी आंदोलन अनाठाई असून सरकार उलटून टाकण्यासाठी आंदोलने केली जातात. अनेकदा आंदोलनाचा राजकीयदृष्या वापर केला जातो. राज्यात भाजपाचे सरकार असताना एसटीबाबत कुठलेही निर्णय झाले नाही. एकीकडे केंद्र सरकार एअर इंडीयाचे खासगीकरण करीत असताना राज्यातील भाजपा नेते एसटीला सरकारमध्ये विलनिकरणासाठी जोर लावत आहे. त्यामुळे भाजपाच्या नेते मंडळीच्या बुद्धीचे दिवाळे निघाल्याचे रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.

रघुनाथदादा पाटील
मुलगी असावी तर अशी... हुंड्याच्या ७५ लाखांचा घेतला कौतुकास्पद निर्णय

यावेळी क्रांतीसिंह नानापाटील ब्रिगेड शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष शिवाजीनाना नांदखिले, शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. अजित काळे, बाळासाहेब पटारे, अनिल औताडे, अशोक पठारे, विलास कदम, युवराज जगताप, संदिप उघडे, मनोज हेलवडे, भास्कर तुवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com