संजय गांधी निराधार योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा

Sanjay Gandhi Niradhar Yojana
Sanjay Gandhi Niradhar Yojana esakal

पारनेर (जि. अहमदनगर) : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे सप्टेंबर अखेर पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. तीन महिन्यापासून या योजनेचे लाभार्थीं अनुदानापासून वंचीत होते. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.
याबाबत सकाळने संजय गांधी योजनेचे लाभार्थीच झाले निराधार अशा मथाळ्याखाली वृत्त प्रकाशीत केले होते. त्यानंतर सरकारी यंत्रणा जागी झाली. परिणामी सप्टेंबर अखेरचे अनुदान ९० टक्के लाभार्थींचे अनुदान संबधीतांच्या खात्यावर जमा झाले.

सकाळने आवाज उठविला अन् मिळाले अनुदान

तालुक्यात संजय गांधी निराधार योजेनेचे तसेच त्यात समाविष्ट असलेल्या तत्सम योजेनेचे ३६ हजार लाभार्थी आहेत. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वाधिक लाभार्थी तालुक्यात आहेत. या योजेनेचे तीन महिेेने अनुदान न आल्याने संबधीतांना पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळी आली होती. याबाबत सकाळने आवाज उठविल्यामुळे नुकतेच हे अनुदान आले. तहसील कार्यालायच्या संबधीत विभामार्फत ते संबधीतांच्या खात्यावर जमा केले.
या योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रांची नियमित पुर्तता न केल्याने अनुदान प्राप्त झाले नव्हते. मात्र, अद्यापही कागदपत्रांची छाणणी झाली नाही. मात्र, याबाबत महसूल मार्फत कागदपत्रांची तातडीने तपासणी करण्यात यावी, असा आदेश तहसीलदारांनी कामगार तलाठ्यांना दिला.

Sanjay Gandhi Niradhar Yojana
"...अन्यथा शासन दरबारी तक्रार केली जाईल," संग्राम जगताप संतापले

राज्य व केंद्र सरकातर्फे राज्यात गोरगरीब व निराधारांसाठी सरकारने विविध पेन्शन योजाना राबविल्या आहेत. त्यात संजय गांधी निराधार योजाना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन या तीन योजणेंतर्गत वृद्ध व निराधारांना अनुदान दिले जाते. योजेनेच्या प्रकारानुसार सहाशे ते एक हजारांचे अनुदान मिळते. सप्टेंबर अखेर लाभार्त्यांना अनुदानाचे वाटप झाले आहे.

''सरकारी पातळीवरूनच अनुदान अपुरे आल्याने काही लाभार्थी शिल्लक राहिले आहेत. त्यांचेही अनुदान प्राप्त होताच त्यांच्या खात्यावर वितरीत केले जाणार आहे. तसेच कागदपत्रांची छाणणीही होणार आहे. मृत व्यक्तींचे अहवाल प्राप्त होताच त्यांची नावे वगळण्यात येतील.'' - अविनाश रणदिवे, नायब तहसीलदार.

Sanjay Gandhi Niradhar Yojana
आरोग्यासाठी आयुर्वेद अंगीकारण्याची गरज; भगतसिंह कोश्‍यारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com