
तालुक्यातील बहादूरा गावातील युवकांना शेळी पालन व्यवसायातून स्वयंरोजगार मिळाला असून इतरांसाठी देखील विकास व रोजगाराची प्रेरणा देणारे हे गाव ‘मॉडेल’ ठरले आहे. येथील दृढनिश्चयी माजी सरपंच विठ्ठल माळी यांनी केवळ समाजकारणाच्या आवडीतून गावातील बेरोजगार युवकांना शेळी पालनातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
बाळापूर (जि.अकोला) : तालुक्यातील बहादूरा गावातील युवकांना शेळी पालन व्यवसायातून स्वयंरोजगार मिळाला असून इतरांसाठी देखील विकास व रोजगाराची प्रेरणा देणारे हे गाव ‘मॉडेल’ ठरले आहे. येथील दृढनिश्चयी माजी सरपंच विठ्ठल माळी यांनी केवळ समाजकारणाच्या आवडीतून गावातील बेरोजगार युवकांना शेळी पालनातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. संपूर्ण गाव ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्यासाठी त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे पंढरीचा विठ्ठल पावेलच परंतु गावातील ‘विठ्ठल’ मात्र गावकऱ्यांना नक्कीच पावला आहे. बाळापूर तालुक्यातील बहादुरा हे केवळ एक हजार लोकसंख्या असलेले गाव. गावात सर्वत्र बेरोजगारी. युवकांच्या हाताला काम नसल्याने तरुणवर्ग व्यसनाधीनतेकडे वळलेले होते. अशातच गावची हि परीस्थिती विठ्ठल माळी यांना बघवत नव्हती. सन २०१५ मध्ये माळी हे सरपंच असताना त्यांनी गाव विकासाचे ध्येय स्वीकारले. त्यांचा विश्वास कृतीत आणण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. गावकऱ्यांची बैठक घेऊन शेळी पालनाचे महत्त्व गावकऱ्यांना पटवून दिले. सुरुवातीला दहा शेतकरी मिळून त्यांनी स्वतः गोट फार्म सुरू केले. या व्यवसायातून नफा मिळाल्याने गावातील ईतर नागरिकांनाही या व्यवसायात त्यांनी आणले. शेती बरोबरच शेळी पालन हा जोडधंदा संपूर्ण गावकऱ्यांनी सुरू केला आहे. आज गावातील प्रत्येक कुटुंबाकडे दहा ते पंधरा शेळ्या आहेत. या व्यवसायातून महिण्याला पंधरा ते विस हजार रुपये निव्वळ नफा गावकऱ्यांना मिळतो. एकूण सहाशे शेळ्या गावात आहेत. सावकाराच्या जाचातून शेतकऱ्यांची सुटका
बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी ‘ॲग्रोवन’ ठरला मार्गदर्शक (संपादन - विवेक मेतकर) |