अकोला: तुमची काही महत्त्वाची बँकेची कामं पेंडिग असतील तर तुम्हाला ती २५ तारखेच्या आत करून घ्यावी लागणार आहेत. कारण राज्याभरातील बँका सलग ३ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित सर्व कामं गुरुवारपर्यंतच उरकून घेणे आवश्यक आहे. तीन दिवसांनंतर एटीएममध्ये पैशांचा तुटवडा जाणवेल. यामुळे आताच रोख रक्कम काढून घ्या. कारण तेच फायद्याचं ठरेल.
या आठवड्यात सलग ३ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे नववर्ष साजरं करण्यासाठी कुठे बाहेरगावी जाण्याचा बेत असेल किंवा तुम्हाला रोखीच व्यवहार करायचे असतील तर ते गुरुवारपर्यंतच उरकून घ्यावे लागणार आहेत.
२५ डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी आणि २६,२७ डिसेंबर चौथा शनिवार, रविवार असल्याने बँका बंद राहतील. त्यामुळे या आठवड्यात सलग तीन दिवस बॅंकांना सुट्टी असणार आहे.
तसंच नवं वर्ष सुरु होताच १ जानेवारीपासून बँकांच्या नियमांमध्येही काही बदल होणार आहेत. त्यामुळे बॅकेशी संबंधित व्यवहार वेळेत पूर्ण करावे लागणार आहेत.
यासोबतच भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका सलग ९ दिवस बंद राहणार आहे. ही माहिती आरबीआयच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.