नांदुरा (जि.बुलडाणा) ः लॉकडाउनच्या अगोदर प्रत्यक्षात कामाला सुरू झालेला टाकरखेड गावाजवळील विश्वगंगा नदीवरचा पूल जवळपास गेल्या एक वर्षांपासून रखडला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पूल होऊ न शकल्याने टाकरखेड ते मलकापूर रस्ता संपूर्ण पावसाळाभर नदीला पाणी वाहत असल्याने वाहतुकीस बंद पडला होता.गाव व वस्तीचा संपर्क पण काही काळ बंद पडला होता. शेतकऱ्यांचे पण अतोनात हाल झाले असतांनाही संबंधित कंत्राटदार व शासकीय अधिकाऱ्यांनी फिरकूनही पाहिले नव्हते.सद्या गेल्या १५ दिवसापासून या 'विश्वगंगा'नदीचे पाणी पूर्णतः आटले असतांनाही संबंधित अधिकारी फिरून पहायलाही तयार नसल्याने हा पूल यावर्षीही पूर्णत्वास जाईल की नाही याबाबत गावकऱ्यात शंका उपस्थित होत आहे. हेही वाचा - शाळांची घंटी आजपासून वाजणार; पालकांची लेखी संमती आवश्यक
हेही वाचा - भाजप म्हणतेय, शाळा बंदच ठेवा; गरिबाच्या मुलांना मोफत स्मार्ट फोन द्या या संपूर्ण सहा महिन्यांच्या काळात अधिकारी किंवा कंत्राटदाराने फिरकूनही पाहिले नाही.हे विशेष.सद्या नदी आटली असून पुलाचे अर्धवट असलेले बांधकाम करण्यासाठी आवश्यक वेळ असतांनाही अजूनही अधिकारी किंवा कंत्राटदार फिरकून पाहत नसल्याने पुढील पावसाळाही असाच जाणार की काय अशा शंका उपस्थित होत असल्याने या पुलाचे बांधकाम संबंधित विभागाने लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
(संपादन - विवेक मेतकर) |
|||
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.