

देऊळगावराजा : तालुक्यातील शिवनी आरमाळ परिसरातील १४ गावांच्या सिंचनाच्या प्रश्नावर बलिदान देणारे कैलास नागरे यांची मागणी पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने सरकारला बाध्य करू अशी ग्वाही नागरे कुटुंबाचे सांत्वन भेटीत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. यावेळी कैलास नागरे यांच्या कुटुंबास शिवसेना (उबाठा)च्या वतीने मुलांचे संगोपन व शिक्षणासाठी पाच लाखांचे फिक्स डिपॉझिट देण्यात आले.