जिल्ह्याची सरासरी पैसेवारीही ५० पैसांच्या आत आहे. शेतकऱ्यांचा सोयाबीन उत्पन्नाचा खर्चही निघाला नाही. असे असतानाही एकाच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन पीक विम्याचा लाभ देण्यात आला आहे. इतर ५१ महसूल मंडळात पीक विमा मिळाला नाही.
अकोला ः जिल्ह्यातील एकाच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन पीक (Soyabeen crop Insurance) विमा मिळाला. इतर ५१ मंडळातील शेतकऱ्यांना निकषांमध्ये अडकवून पीम विम्यापासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर (Randheer Sawarkar) यांनी गुरुवारी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना जाब विचारला. (Farmers deprived of crop insurance; MLA Randhir Savarkar asked the question)
जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामात सोयाबीन पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्याची सरासरी पैसेवारीही ५० पैसांच्या आत आहे. शेतकऱ्यांचा सोयाबीन उत्पन्नाचा खर्चही निघाला नाही. असे असतानाही अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातील हातरून या एकाच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन पीक विम्याचा लाभ देण्यात आला आहे. इतर ५१ महसूल मंडळात पीक विमा मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांसोबत विमा कंपनीच्या प्रतिनिधीना धारेवर धरून जाब विचारला. कोणते निकष लावून शेतकऱ्यांना विम्यापासून ठेवले वंचित ठेवण्यात आले याबाबत विचारणा करण्यात आली.
यावेळी त्यांच्या सोबत माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, ॲड. अभय थोरात, माधव मानकर, राजेश बेले, अंबादास उमाळे, गणेश तायडे, राजेश्वर वैराळे, विनायक वैराळे आदींसह भाजप पदाधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय अकोला येथे उपस्थित होते.
संपादन - विवेक मेतकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.