अ‍ॅग्रो

शंभर लाख कापूस गाठी खरेदी करा

सकाळवृत्तसेवा

भारतीय कापूस महासंघाची मागणी; सलग तिसऱ्या वर्षात उत्पादनवाढीची शक्‍यता 
नवी दिल्ली - देशात यंदाच्या २०१७-१८ (आक्‍टोबर-सप्टेंबर) हंगामात कापसाचे भरघोस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. यामुळे आवक वाढून दर कमी होऊ नयेत, यासाठी सीसीआयद्वारे १०० लाख कापूस गाठींची (एक कापूस गाठ-१७० किलो) खरेदी करण्याचे निर्देश केंद्राने द्यावे, अशी मागणी भारतीय कापस महासंघाने (आयसीएफ) नुकतीच केली आहे.

आयसीएफने म्हटले आहे, की यंदाच्या खरीप हंगामात कापूस पेरा सुमारे १२२.६ लाख हेक्‍टरपर्यंत झाला असल्याची नोंद आहे. अनुकूल हवामान आणि चांगल्या पावासमुळे सलग तिसऱ्या वर्षात देशामध्ये कापसाचे भरघोस उत्पादन होईल, अशी शक्‍यता आहे. २०१७-१८ हंगामात ४०० लाख कापूस गाठींचे उत्पादन शक्‍य आहे. देशातील विविध जीनिंग मीलचा कापूस वापर ३०० ते ३१० लाख कापूस गाठी राहील, असा अंदाज आहे. 

भारतीय शेतकरी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत सुमारे ७० टक्के कापूस बाजारात आणतात. या कापसाची अंदाजे किंमत ५८ हजार ३०० कोटी रुपये असते. आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या (आयसीएसी) एका अहवालानुसार उत्पादनवाढीचा अंदाज असल्याने भारताप्रमाणेच इतर काही देशांनाही अतिरिक्त कापसाचा प्रश्‍न भेडसावणार आहे. 

आयात, निर्यात आणि दराचे चक्र
अनुदान देऊन किंवा इतर बाबींद्वारे कापूस निर्यात वाढविण्याचे प्रयत्न केले जातात; मात्र याचा नकारात्मक परिणाम होत असतो. कारण, यामुळे जागतिक कापसाच्या किमती कमी होतात. याचा देशांतर्गत वा स्थानिक बाजारातील दरांवर परिणाम होतो आणि पुन्हा कापसाची निर्यात करावी लागते. असे हे आयात, निर्यात आणि दराचे चक्र असल्याचे भारतीय कापूस महासंघाचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Supriya Sule : आईवर बोलला तर करारा जबाब देईन - सुप्रिया सुळे

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT