Soybean
Soybean 
अ‍ॅग्रो

सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता नाही

सुरेश मंत्री

देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सध्या सोयाबीनचे दर प्रति क्विंटल ३५०० ते ३५५० रुपयांच्या दरम्यान आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन ते चार हजारांच्या पातळीला जातील, या आशेने बराच माल साठवून ठेवला आहे. परंतु नजीकच्या काळात सोयाबीनच्या दरात तेजी येण्याची शक्यता नाही. विशिष्ट परिस्थितीत सोयाबीनच्या दरात जास्तीत जास्त ५० ते १०० रुपयांची वाढ होऊ शकते. त्या दरपातळीला शिल्लक सोयाबीन विकून टाकणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. तेजीच्या अपेक्षेने माल तसाच शिल्लक ठेवला तर तोटा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

यंदा सोयाबीनच्या दरात मोठे चढ-उतार दिसून आले. मध्यंतरीच्या काळात सोयाबीन किमान आधारभूत किमतीच्या (हमीभाव) खाली गेल्याने सरकारी खरेदीची वेळ आली. अर्थात सरकारी खरेदीचे प्रमाण अत्यंत तोकडे राहिले. नंतरच्या टप्प्यात सोयाबीनच्या दरात सुधारणाही झाली. व्यापाऱ्यांनी मालाचा तुटवडा पडेल, या आशंकेने खरेदीसाठी जोर लावला होता. त्याचाही मोठा परिणाम बाजारावर दिसला. परंतु आता तुटवड्याची शक्यता संपली आहे. तसेच यंदा मॉन्सूनचे आगमन आणि पावसाचे प्रमाण याविषयी सकारात्मक अंदाज असल्याने येत्या खरिपात सोयाबीनचा पेरा चांगला राहील, अशी भावना बाजारात आहे. या सगळ्या घटकांचा परिणाम म्हणून आता लगेच सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता अंधुक आहे. 

येत्या खरिपात शेतकरी सोयाबीनलाच पसंती देतील असे सध्याचे चित्र आहे. कापसाच्या दरात सध्या तेजी असून आंतरराष्ट्रीय बाजारातही दर चढे आहेत. त्यामुळे येत्या खरिपात कापसाची लागवड करणे किफायतशीर ठरायला पाहिजे. परंतु गेल्या हंगामात गुलाबी बोंड अळीमुळे पीकसंरक्षणचा खर्च वाढला आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. बोंड अळीची समस्या आणि बीटी बियाण्यांची कमी झालेली परिणामकारकता यावर अद्याप उपाय सापडलेला नाही. त्यामुळे दरात तेजी असूनही शेतकरी कापूस लागवडीची जोखीम कितपत पत्करतील, याविषयी बाजारात संभ्रम आहे. तसेच तूर, मूग, उडीद या प्रमुख खरीप कडधान्यांचे दर घसरल्याने ही पिके सरत्या हंगामात शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरली नाहीत. या पार्श्वभूमीवर सोयाबीनच्या सध्याच्या हमीभावात केंद्र सरकारने १०० ते २०० रुपयांची वाढ केली तरी हमीभाव प्रतिक्विंटल ३१५० ते ३२५० रुपयांच्या दरम्यान राहतील. आजच्या परिस्थितीचा विचार करता हा हमीभाव शेतकऱ्यांसाठी आकर्षक ठरेल. त्यामुळे राज्यात सोयाबीनकडेच शेतकऱ्यांचा ओढा राहण्याची चिन्हे आहेत.

    सोयाबीनच्या दरात मोठ्या तेजीची शक्यता नाही. प्रतिक्विंटल चार हजारांची पातळी गाठणे अवघड.
    सध्याच्या दरात ५० ते १०० रुपयांपेक्षा अधिक वाढ होणार नाही.
    तेजीच्या अपेक्षेने माल साठवून ठेवणे तोट्याचे ठरेल.
    येत्या खरिपात सोयाबीनच्या हमीभावात १०० ते २०० रुपये वाढ होण्याची शक्यता.
    कापूस आणि कडधान्यांच्या तुलनेत शेतकऱ्यांची पसंती सोयाबीनलाच राहण्याचा अंदाज.

(लेखक शेतीमाल बाजार विश्लेषक असून प्रो इंटेलिट्रेड सर्व्हिसेसचे संचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT