अ‍ॅग्रो

परदेशी भाजीपाल्यातून सहा कोटींची उलाढाल

संदीप नवले

खेड तालुक्यातील (जि. पुणे) आळंदीपासून दोन किलोमीटर अंतरावर चऱ्होली हे सुमारे सहा हजार लोकसंख्येचे गाव. या परिसरात मोठ्या प्रमाणात शहरीकरण होऊ लागल्याने पीक लागवडयोग्य क्षेत्र कमी होऊ लागले. याचबरोबरीने पाणीटंचाईमुळे शेतीचे नियोजन कोलमडले. पाणीटंचाईमुळे येथील शेतकऱ्यांनी हंगामी भाजीपाला लागवडीवर लक्ष केंद्रित केले. या शेतकऱ्यांपैकीच आहेत जयसिंग शिवाजी थोरवे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित सात एकर शेती. यामध्ये कांदा, बटाटा, वांगे, टोमॅटो; याचबरोबरीने फुलशेतीचे नियोजन असायचे. परंतु, बाजारपेठेचा अभ्यास आणि परिसरातील ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन त्यांनी भाजीपाला लागवडीस सुरवात केली.

परदेशी भाजीपाल्यातून पीक बदल 
जयसिंग थोरवे हे आयटी कंपनीत काम करीत असताना त्यांना कंपनीमधील लोकांकडून परदेशी भाजीपाल्याची मागणी लक्षात आली. त्यामुळे थोरवे यांनी २००४ पासून पीक बदलास सुरवात केली. पहिल्या टप्प्यात मागणीनुसार परदेशी भाजीपाला पिकांच्या लागवडीचे वेळापत्रक तयार केले. बाजारपेठेत जाऊन माहिती घेतली. त्यानुसार टप्प्याटप्प्याने भाजीपाला लागवड सुरू केली. कंपनीमधील लोकांना भाजीपाला विक्रीस सुरवात केली. यादरम्यान योग्य नियोजन आणि दर्जेदार उत्पादनामुळे परदेशी भाजीपाला विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यामुळे मागणीत वाढ झाली. त्यानुसार त्यांनी भाजीपाला लागवडीचे क्षेत्र वाढविले. सुमारे पंधरा वर्षे विविध कंपन्यांमध्ये नोकरी केल्यानंतर जयसिंग थोरवे यांनी २०१२ मध्ये नोकरी सोडून पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. परदेशी भाजीपाला लागवडीवर लक्ष केंद्रित केले. पुणे बाजारपेठेतील परदेशी भाजीपाला उलाढालीचा अभ्यास केला. विविध लोकांशी संपर्क साधला. याच काळात त्यांनी शेतकरी गटाची उभारणीदेखील केली. त्यामुळे विविध भाजीपाल्याच्या लागवडीचे नियोजन करणे सोपे जाऊ लागले. मागणीनुसार पुरेसा भाजीपाला उपलब्ध होऊ लागला.

शेतकऱ्यांना प्रशिक्षण
गटातील शेतकऱ्यांना भाजीपाल्याचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी लागवड, पीक व्यवस्थापनातील सुधारित तंत्रज्ञान पोचविले जाते. वेळोवेळी प्रशिक्षणाचे आयोजन.
गटाने आतापर्यंत २०० हून अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. भाजीपाला उत्पादन वाढण्यास चांगली मदत.

बेरोजगरांना संधी 
गटाने परदेशी भाजीपाल्याची विक्री सुरू केल्यामुळे पुण्यात ४७ आणि मुंबई, गोवा, पनवेल अशा विविध ठिकाणी ६० जणांना रोजगार उपलब्ध.

मराठवाडा मिशन १००१ 
दुष्काळी परिस्थितीत मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बेरोजगार तरुण मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी गटांमार्फत मुंबईमध्ये वर्षभरात ‘मराठवाडा मिशन १००१’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये तरुणांना भाजीपाला विक्रीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे चांगला रोजगार तयार होईल. सध्या मुंबईमध्ये १९ मुले भाजीपाला विक्रीत सहभागी झाली आहेत. 

सोशल  मार्केटिंगसाठी टीम 
उत्पादित होणारा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहचविता यावा, यासाठी गटाने सोशल मार्केटिंगसाठी स्वतंत्र टीम उभी केली. माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना भाजीपाल्याची विक्री करताना तो कोणत्या शेतकऱ्याच्या शेतात उत्पादित झालेला आहे, याची माहिती मिळते. याचबरोबरीने ग्राहकाला जर संबंधित शेतकऱ्याच्या शेतीस भेट द्यायची असेल, तर तसे नियोजनही गटातर्फे केले जाते.

जयसिंग थोरवे - ९३७३११०९७६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: भाजपचे उमेदवार पराभूत होणार हे लक्षात आल्याने भाजप सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतला आहे- राजू शेट्टी

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

Summer Trip: उन्हाळ्यात चेरापुंजीला फिरायला जाण्याता प्लॅन करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीला दुसरा मोठा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले पॅव्हेलियनमध्ये

SCROLL FOR NEXT