pani foundation 
अ‍ॅग्रो

‘पाणी फाउंडेशन’च्या माध्यमातून राज्यात ‘जलसेना’

सकाळवृत्तसेवा

मुख्यमंत्री : वॉटर कपसाठी ३० तालुक्‍यांची घोषणा 

मुंबई - सिनेअभिनेता अामीर खान यांच्या पुढाकाराने दुष्काळमुक्‍त महाराष्ट्रासाठी राज्यात ‘पाणी फाउंडेशन’च्या माध्यमातून सुरू असलेली ‘वॉटर कप स्पर्धा’ लोकचळवळ होत असून, यामधूनच राज्यात ‘जलसेना’ उभी राहत आहे. ही जलसेनाच आगामी काळात महाराष्ट्राला दुष्काळमुक्‍त करेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. 3) व्यक्‍त केला. 

सह्याद्री अतिथीगृह येथे वॉटर कप स्पर्धा-२०१७ ची घोषणा करण्यात आली. या वेळी १३ जिल्ह्यांतील ३० तालुक्‍यांची घोषणा करण्यात आली. पाणी फाउंडेशनचे सर्वेसर्वा अामीर खान, सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, पोपटराव पवार, किरण राव यांच्यासह टाटा, रिलायन्स, पिरामल, पारेख या उद्योग समूहाचे अधिकारी, संगीतकार अजय अतुल, दिग्दर्शक नागराज मंजुळे उपस्थित होते. 

सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवारदेखील या वेळी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, की आजपर्यंत पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेला लोकचळवळीचे स्वरूप दिले नसल्याने ती अपयशी झाली. आगामी काळात या चळवळीतूनच महाराष्ट्र दुष्काळमुक्‍त होईल. 

दंगल या चित्रपटाला यश मिळाल्यानंतर जेवढा आनंदा झाला त्यापेक्षा अधिक आनंद या वर्षीच्या तीस तालुक्‍यांतल्या कामांना यश मिळाले तर होईल, अशी भावना अामीर खान यांनी व्यक्‍त केली, तर शिस्त व शास्त्रावर विश्वास ठेवून पाणी फाउंडेशन राज्यात काम करत असल्याचे डॉ. पोळ म्हणाले. 

निवडलेले ३० तालुके 
स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०१७ आहे. स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे २०१७ असा आहे. स्पर्धेसाठी पहिले बक्षीस ५० लाख, दुसरे बक्षीस 30 लाख, तर तिसरे बक्षीस 20 लाख रुपये आहे. 


या स्पर्धेसाठी अंबाजोगाई, केज, धारुर, जि. बीड, औसा, निलंगा, जि. लातूर, भूम, परंडा, कळंब, जि. उस्मानाबाद, फुलंब्री, खुलताबाद, जि. औरंगाबाद, कोरेगाव, माण, खटाव, जि. सातारा, पुरंदर, इंदापूर, जि. पुणे, खानापूर, आटपाडी, जत, जि. सांगली, सांगोला, उत्तर सोलापूर, जि. सोलापूर, बार्शी-टाकळी, पातूर, अकोट, जि. अकोला, कारंजा, जि. वाशीम, राळेगाव, कळंब, उमरखेड, जि. यवतमाळ, आर्वी, जि. वर्धा, वरुड, धारणी, जि. अमरावती या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. 

सकाळ माध्यम समूहाच्या कार्याचे कौतुक 
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या कार्याचे कौतुक केले. राज्यभरात सकाळ समूह जलसंधारणच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असल्याचे ते म्हणाले. सकाळ माध्यम समूहाच्या ‘तनिष्का’ या महिलांच्या संघठनाने पाण्याच्या क्षेत्रात राज्यभरात मोठे काम उभारले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT