अहमदनगर

दारू स्वस्त; वीज महाग

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने कवडीचीही मदत केली नाही. दारूवरील कर माफ करणारे सरकार शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ शकत नाही. वीजबिलासाठी रोहित्रे बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धराल, तर आंदोलन तीव्र करू, असा इशारा भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीजबिलमाफीसाठी महावितरण कार्यालयावर काढलेल्या एल्गार मोर्चात ते बोलत होते. शहरातील तीन बत्ती चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला. विखे पाटील म्हणाले, की वसुली करता करता सरकारमधील मंत्री तुरुंगात गेले आहेत. पोलिस अधिकारी फरार आहेत. अनेक जण ईडीच्या कार्यालयात खेटा घालत आहेत. निवडणुकीत दिलेल्या शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या आश्वासनाची पूर्ती करावी.

आघाडी सरकारचा टांगा पलटी झाला ना, की पुन्हा आम्हीच आहोत. त्यामुळे तुमच्या नियमातच काम करा. उगाच शेतकऱ्यांना डिवचू नका. आठ दिवसांत तोडलेले वीजजोड पुन्हा न जोडल्यास कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. आपले अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार फक्त केंद्राकडे बोट दाखवून मोकळे होते. मंत्र्यांना गावात फिरू देऊ नका, त्यांना जाब विचारा, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Latest Marathi News Update: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT