Can the law of transfer of party be implemented in the Gram Panchayat 
अहिल्यानगर

ग्रामपंचायतीत पक्षांतर बंदीचा कायदा लागु करता येईल का? सरकारकडून चाचपणी सुरु

मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : गावातील गटबाजी व पक्ष बदलामुळे ग्रामपंचायत सत्ता नेहमी अस्थीर होते. ग्रामपंचायती स्थीर करण्यासाठी विधानसभा, लोकसभा व जिल्हा परीषदेप्रमाणे पक्षांतर बंदीचा कायदा ग्रामपंचायतींना सुद्धा लागू करावा, अशी मागणी राज्याच्या सरपंच परीषदेने सरकारकडे केली होती. या मागणीचा विचार करून सरकारने हा कायदा ग्रामपंचायतीसाठी लागू करता येईल का? याची चाचपणी करण्यासाठी विधी विभागाकडे सरकारने हा प्रस्ताव तपासणीसाठी पाठविला आहे.

लोकशाहीत ग्रामपंचायत हा खऱ्या अर्थाने राजकारणाचा पाया आहे. अनेक तरूणांची राजकारणाची सुरूवात ग्रामपंचायतीपासून होत असते. ज्याची गावात सत्ता असते त्यांचे तालुका व जिल्हा पातळीवरील राजकारणात राजकिय वजन निर्माण होते. परंतु गावातील गटबाजी भाउबंदकी तसेच हेवेदावेचे राजकारण असते. त्यामुळे ग्रामपंचायतीचे राजकारण सर्वात कठीण मानले जाते. मात्र अनेकदा सरपंचांना आपली सत्ता टिकविण्यासाठी अनेक तडजोडी काराव्या लागतात. त्याचा परिणाम गावाच्या विकासावर होतो. त्यासाठी पक्षांतर बंदी कायदा ग्रामपंचातीच्या सदस्यांनाही लागू करावा, अशी मागणी सरपंच परीषदेची होती.

सरपंच पद स्थीर झाले तर गावाच्या विकासाला निश्चितच चालना मिळाल्याशिवाय राहाणार नाही. काही दिवसापुर्वी भाजपच्या सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडीचा कायदा केला होता. त्यामुळे पहिल्या आडीच वर्षात किमान सरपंचावर अविश्वासाचा ठराव अनता येत नव्हता. त्यामुळे सरपंचाला गावाचा विकास करण्यावर लक्ष केंद्रीत करता येत होते. मात्र हा कायदा बदलून पुन्हा अत्ताच्या सरकारने ग्रामपंचायत सदस्यामधूनच सरपंचाची निवड करण्यात येईल, असा कायदा केला आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा सरपंचपद अस्थीर झाल्याची भावाना सरपंच परीषदेची झाली आहे. त्यामुळे सरपंच परीषदेने पुन्हा एकदा किमान पक्षातर बंदीचा कायदा ग्रामपंचायत सदस्यानाही लागू करावा, अशी मागणी केली आहे. ती जर सरकारने मान्य केली व तसा कायद्यात बदल केला तर ग्रामपंचायत पातळीवरील सरपंचांची सत्ता स्थीर राहाण्यास मदत होईल व गावाच्या विकासालाही चालणा मिळेल.

खेड्यांचा व गावांचा जोमाने विकास करावयाचा असेल व गावातील सत्ता स्थीर करावी लागेल. त्या साठी ग्रामपंचायत पातळीवरही पक्षांतर बंदीचा कायदा लागू करणे गरजेचे आहे. तसा सरकारने कायदा करावा अशी आमची मागणी आहे.
- दत्ता काकडे, अध्यक्ष सरपंच परीषद 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Board Exam: कॉपी करणाऱ्यांची आता खैर नाही! दहावी–बारावीच्या परीक्षा हायटेक पद्धतीने होणार; महाराष्ट्र बोर्डचा मोठा निर्णय

Virat Kohli's World Record: कोहलीचा 'विराट' पराक्रम, नावावर केला विश्वविक्रम; क्रिकेट विश्वातील दिग्गजाला मागे सोडले

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार? सर्वात मोठी अपडेट, कुणी केली मागणी?

Latest Marathi News Live Update : शरद पवार हे आगामी काळात एनडीएमध्ये सामील होऊ शकतात मंत्री संजय शिरसाठ यांचे विधान

Crime News : इन्स्टाग्रामवर ओळख, प्रेमसंबंधाला नकार देताच तरुणीवर हल्ला; भररस्त्यात तरुणाने तिचे कपडे फाडण्याचा केला प्रयत्न

SCROLL FOR NEXT