नगर ः २०२०-२१ खरीप हंगाम पिक कर्ज वाटपासाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मुदत ३१ ऑगष्ट पर्यंत होती. परंतु शेतक-यांच्या मागणी व अडचणीचा विचार करून बँकेने पिक कर्ज वाटपाची मुदत १५ सप्टेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय बँकेने घेतला असल्याची माहिती बँकचे चेअरमन सिताराम पाटील गायकर व व्हाईस चेअरमन रामदास वाघ व जेष्ठ संचालक माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी दिली.
अहमदनगर जिल्हयात सर्वत्र पाऊस चांगला झाला आहे. जिल्हयातील शेतक-यांची पिक कर्जासाठी जिल्हा बँकेकडे मोठया प्रमाणावर कर्ज मागणी होत आहे. बँकेने शेतक-यांच्या सेवा सोसायटीमार्फत जनरल क.म.पत्रक व पुरवणी कर्ज मागणीस मंजुरी देण्यात आलेल्या आहेत. अद्यापि अनेक शेतकरी सभासदांनी कर्ज उचल केली नसल्याने त्यांची पिक कर्जाची मागणी येत आहे.
जिल्हयातील शेतकरी मोठया प्रमाणावर खरीप पिकाची तयारी करीत असुन पीक कर्ज पुरवठा सुरळीत सुरू आहे. शासनाने दिलेले चालु खरीप हंगामासाठीचे वाटपाचे उद्दिष्ट रु.१४९८ कोटीचे दिले होते. ते पुर्ण करुन बँकेने उद्दिष्टापेक्षा जास्त वाटप केले आहे.
आज रोजी बँकेने रु.१६३५ कोटीचे वाटप केले असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सीताराम पाटील गायकर व व्हाईस चेअरमन रामदास वाघ व जेष्ठ संचालक शिवाजीराव कर्डीले यांनी दिली.
बँकेने या कर्ज वाटप दिलेल्या मुदतीचा लाभ जिल्हयातील शेतक-यांनी घेण्याचे आवाहन चेअरमन गायकर पाटील यांनी केले आहे. बँकेने शेतकरी व शेती विकास हा केंद्रबिंद मानून बँक नेहमीच शेतक-यांच्या हितांच्या दृष्टीने निर्णय घेत आहे.
संपादन - अशोक निंबाळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.