It is not possible to appoint a private administrator on the Grampanchayat 
अहिल्यानगर

ग्रामपंचायतीवर खाजगी प्रशासकाची नियुक्ती करता येणार नाही; न्यायालयात २४ ऑगस्टला पुढील सुनावणी

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : ग्रामपंचायत प्रशासकबाबत न्यायालयाने पुन्हा एकदा सरकाराला दणका दिला आहे.

आज झालेल्या सुनावणीत दरम्यान पुढील सुनावणीपर्यंत सरकारला मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर खाजगी प्रशासकाची नियुक्ती करता येणार नसल्याचे सांगितले, असल्याची माहीती सरपंच परिषदेचे दत्ता काकडे व अनिल गिते यांनी दिली. सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्ट येथे सुनावणी आज (ता. १४) पार पडली. सरपंच परिषदेच्या वतीने विधिज्ञ नितीन गवारे यांनी बाजू मांडली.

न्यायालयाने याप्रकरणी २४ ऑगस्ट ही तारीख दिली असून तोपर्यंत शासनाने मुदत संपलेल्या व मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतवर प्रशासक म्हणून खाजगी व्यक्तीची नियुक्ती करू नये. तो पर्यंत शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करावी, असे न्यायालयाने सरकारला बजावले एक प्रकारे सरपंच परिषदेच्या लढ्याला आज यश आले.

शासन वेगवेगळी पत्रके काढून ग्रामपंचायतीवर पालकमंत्री यांच्या सल्ल्याने खाजगी व्यक्तीची नियुक्ती करत होते. त्याला आजचा चाप बसला. या सुनावणीत विधिज्ञ नितीन गवारे यांच्यासोबत सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे उपस्थित होते. सरपंच परिषदेचे सर्व विश्वस्त याप्रकरणी न्यायालयीन लढ्यासाठी पाठपुरावा करत आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

पंचनाम्याचे निकष शेतकऱ्यांच्या जिव्हारी! अतिवृष्टीच्या भरपाईसाठी ‘हे’ निकष अडचणीचे; ॲग्रीस्टॅक क्रमांक, ई-पीक पाहणी नोंदीचा अडथळा; शेतातील जिओ टॅगिंग फोटोचीही अट

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

SCROLL FOR NEXT