Pits in middle of road on bridge over river Bhima danger for transportation  sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : पुलावरील खड्डे; मृत्यूचे अड्डे

भीमा नदीवरील रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक

सचिन गुरव

सिद्धटेक : भीमा नदीवरील पुलावरील रस्त्याची दोन वर्षांपूर्वी दुरुस्ती केल्यानंतर आता तो पुन्हा उखडला आहे. सद्यःस्थितीत वाहतुकीसाठी धोक्याचा झाला आहे. रस्त्यात मध्यभागी खड्डे पडले असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

दोन वर्षांपूर्वी मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर आला होता. नदीच्या जोरदार प्रवाहाचे पाणी पुलावरून गेल्याने पुलावरील रस्ता उखडला होता. त्यावेळी महिनाभर वाहतूक बंद ठेवून रस्त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने केली होती. १५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल सुस्थितीत असताना दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या दुरुस्ती कामाचा दर्जा यातून स्पष्ट होतो. खड्डे चुकविण्याच्या घाईत वाहनचालकांकडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

पवारांचे लक्ष, पण तरीही

पुणे व अहमदनगर या जिल्ह्यांना जोडणाऱ्या या पुलाच्या तेव्हा झालेल्या दुरुस्तीच्या कामाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष लक्ष दिले होते. या कामाला प्रत्यक्ष भेट देऊन, काम योग्य दर्जाचे करण्यासाठी बांधकाम अधिकारी व ठेकेदार यांची कानउघाडणीही केली होती. मात्र, तरीही कामाचे व्हायचे तेच झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT