The politics of the village ignited 
अहिल्यानगर

ग्रामपंचायतीत अधिकारी प्रशासक आले पण गावगुंडीला आलाय जोर

दत्ता इंगळे

नगर तालुका ः गावपातळीवर ग्रामपंचायत सदस्य व सरपंच, उपसरपंचांना मुदतवाढ देण्याऐवजी प्रशासकांच्या ताब्यात गावगाड्याचा कारभार दिला गेला. तशा अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्याही सुरू झाल्या आहेत. वर्षानुवर्षे गावगाडा चालविणारे गावपुढारी भविष्यातील ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून "गावगुंडी' करण्यासाठी सरसावले आहेत. गावपातळीवरील रथी- महारथी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप, निवेदने, तक्रारींच्या माध्यमातून एकमेकांविरोधात शड्डू ठोकू लागले आहेत. 

कोरोनाच्या प्रभावाने राज्यातील बहुतेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका बेमुदत पुढे ढकलण्यात आल्या. सरकारने आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतीवर प्रशासकाच्या माध्यमातून हंगामी पदे देण्याचा घाट घातला होता. मात्र, त्यात न्यायालयाने हस्तक्षेप करीत शासकीय कर्मचाऱ्यांनाच ग्रामपंचायतींचा हंगामी कारभार पाहण्यास सांगितले. त्यानुसार आता तालुका पातळीवरील विविध विभागांत कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या जाहीर केल्या जात आहेत. 

कोरोनाचा प्रभाव संपताच गावात निवडणुका होतील व आपला गट पुन्हा गावगाडा चालविण्यासाठी सत्तेवर यावा, यासाठी गावपुढारी तयारीला लागले आहेत. वर्षानुवर्षे गावगाडा चालविणाऱ्या मुरब्बी पुढाऱ्यांपासून ते युवा वर्गानेही आरोप- प्रत्यारोप सुरू केले आहेत. जगाला, देशाला कोरोनाच्या पाशाने जखडले असताना गावकरी एकमेकांच्या जिरवा-जिरवीसाठी सज्ज झाले आहेत. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT