The state government does not want to give reservation to Marathas, Snehalta Kolhe alleges 
अहिल्यानगर

राज्य सरकारला मराठ्यांना आरक्षणच द्यायचं नाही, स्नेहलता कोल्हेंची कारणमीमांसा

मनोज जोशी

कोपरगाव : ""मराठा समाजातील अनेक नेते राज्याच्या राजकारणात आहेत. मराठा समाजाचे बहुसंख्य आमदार सरकारमध्ये प्रतिनिधित्व करतात. मंत्रिपदेही भूषवीत आहेत; मात्र मराठा आरक्षणाबाबत उदासीनतेमुळे ही नेतेमंडळी समाजाला न्याय देऊ शकत नाही. या उदासीन सरकारला मराठा समाज कदापि माफ करणार नाही,'' अशी टीका भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली. 

त्या म्हणाल्या, ""मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलने झाली, मोर्चे निघाले. या प्रश्नाची तीव्रता लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात विशेष लक्ष घातले. उच्च न्यायालयात आरक्षण टिकेल असे प्रयत्न केले; परंतु या सरकारच्या काळात राज्यकर्त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळेच आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.'' 

""आघाडी सरकार हा प्रश्न व्यवस्थित हाताळू शकले नाही. आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या फडणवीस यांच्यावर काही संकुचित नेत्यांनी ते "ब्राह्मण' म्हणून वातावरण कलुषित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. 

जनतेचा कौल नसताना सत्तेसाठी जुगाड जमवून अपघाताने आलेले हे सरकार एकमेकांचे रुसवे-फुगवे काढण्यात आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या करून आर्थिक सोयीचे निर्णय घेण्यात मग्न आहे. पोलिसभरतीचा निर्णय घेऊन मराठा समाजाच्या युवकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करीत आहे,'' असा आरोपही कोल्हे यांनी केला. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT