Agronomist Shashank Date said that post harvest processing of turmeric increases the yield and also improves the quality of turmeric.jpg 
अकोला

हळदीवर काढणीपश्‍चात प्रक्रिया केल्यास उत्पन्नात वाढ

सकाळ वृत्तसेवा

जळगाव (जा) (बुलढाणा) :  हळद आणि अद्रक ही शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाची पिके आहेत. हळद बियाण्यांच्या निवडीपासून काढणीपश्‍चातच्या व्यवस्थापनापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ही महत्त्वाची असते. या सर्व प्रक्रियेचा हळद व अद्रक उत्पादक शेतकऱ्यांनी अभ्यास करणे गरजेचे असते. हळदीच्या बियाण्यांच्या निवडीपासून व काढणीनंतरच्या हळद उकळविणे, सुकविणे, पॉलिशिंग आदी प्रक्रिया ही शास्त्रोक्त पद्धतीने करणे गरजेचे असते. यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पन्नात वाढ होऊन हळदीची गुणवत्ता सुद्धा सुधारते, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे उद्यान विद्याशास्त्रज्ञ प्रा. शशांक दाते यांनी केले.

लाडणापूर येथे ‘हळदीच्या प्रक्षेत्रावर हळदीचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञात’ या विषयावरील कार्यशाळेत शुक्रवारी (ता. ५) शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

या कार्यक्रमात केंद्राचे प्रा. शशांक दाते यांनी उपस्थित शेतकऱ्यांना हळद लागवड करताना नवीन सुधारित वान, अनद्रव्य व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन तसेच काढणी करताना करावयाचे शास्त्रीय पद्धत याबद्दल सांगितले. हळद प्रक्रिया करताना उकडणी, वाळवणे आणि पॉलिशिंग महत्त्वाची असल्याचे निदर्शनात आणून दिले. पॉलिशिंग करताना योग्य वेळ आणि इतर घटक मिश्रण केल्यास गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होते, असे त्यांनी सांगितले. परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशिक्षणामुळे त्यांच्या पद्धतीत सुधारणा होत असल्याचे महत्त्व विशद केले. तसेच येथील प्रगतिशील शेतकरी वसंत अस्वार आणि इतर शेतकऱ्यांनी शेतातील प्रत्यक्ष अनुभव विशद केला. 

प्रशिक्षणच्या सफल आयोजनास संतोष आस्वार यांचे महत्त्वाचे योगदान लाभले. तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला. आपल्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी हळद, अद्रक ही महत्त्वाची पिके असून शेतकऱ्यांना याविषयी काही समस्या व अडचणी असल्यास त्यांनी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ प्रा. विकास जाधव आणि आपल्याशी सातत्याने संपर्क करावा, असे आवाहनही यावेळी प्रा. दाते यांनी केले. 

लाडणापूर येथील प्रक्षेत्रावर संपन्न झालेल्या या कार्यशाळेला परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. हळद आणि अद्रक पिकाविषयी शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे प्रा. शशांक दाते यांनी निराकरण केले. झालेल्या कार्यशाळेबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT