अकोला : कापूस खरेदी करताना ग्रेडिंगमध्ये होणाऱ्या अडचणी दूर करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव कृष्णा अंधारे व शेतकरी जागर मंचचे मनोज तायडे यांनी एका निवेदनाद्वारे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचेकडे केली आहे.
कापूस खरेदीत होणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या दिरंगाईस आळा घालण्याकरिता कापूस खरेदी केंद्र सीसीआय, कॉटन फेडरेशन येथे कापसाची हमी किंमत ५८५० रुपये असून, ती सीसीआय व फेडरेशनद्वारे शेतकऱ्यांना ५६१५ रुपये किंवा ५५२५ रुपये एवढीच दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल नुकसान होत असून, कापूस गाडी व ट्रॅक्टर मोजण्याकरिता दोन ते तीन दिवस लागत आहेत. याकरिता अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले जावेत. जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव कृष्णा अंधारे व शेतकरी जागर मंचचे मनोज तायडे यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना दिले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.