Farmer Agitation Sakal
अकोला

जिगाव प्रकल्पाच्या भिंतीवर शेतकऱ्यांची आमरण उपोषणाला सुरुवात

जास्त पाऊस, अतिवृष्टी झाल्यास तिवडी आणि सुलतानपूर ही धरणाच्या लगतची १००% पाण्याखाली जाणार आहेत. शासनाने याबाबतीत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव (जामोद) (जि. बुलडाणा) - जिगाव सिंचन प्रकल्पाअंतर्गत संपूर्ण तालुक्यातील बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी कलम ११/२१ लागू करून त्यांना शासनाने केव्हाच पूरेपूर मोबदला दिला आहे. परिसरातील कोसो दूरच्या शेतकऱ्यांच्या सर्व जमिनीचा भूसंपादनचा मार्ग पैसे देऊन मोकळा झाला. परंतु, प्रकल्पापासून केवळ शंभर मीटर अंतरावरील ग्राम तिवडी आणि सुलतानपूरच्या डुबीत जमिनीचा भूसंपादनाचा मार्ग जिगाव प्रकल्प विभागाने हेतुपुरस्पर प्रलनबीत ठेवला आहे. या मोबदल्याची शेतकऱ्यांनी जिगाव प्रकल्पाच्या भिंतीवर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

जास्त पाऊस, अतिवृष्टी झाल्यास तिवडी आणि सुलतानपूर ही धरणाच्या लगतची १००% पाण्याखाली जाणार आहेत. शासनाने याबाबतीत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले आहे. शासन या शेतकऱ्यांच्या जीविताशी खेळत आहे. शेतकऱ्यांच्या या भूसंपादनाच्या प्रश्नाविषयी वारंवार आंदोलने केली. या विभागाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी बुलडाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसह रात्रभर मुक्काम आंदोलन सुद्धा केले आहे.

याविषयी प्रशासनाने वारंवार दिलेले शब्द फिरवले आहेत. कलम ११ लागू केल्यानंतर ही शब्द फिरवणे म्हणजे हा शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय आहे. येत्या आठवड्यात जिगाव प्रकल्प अंतर्गत तीवडी आणि सुलतानपूरच्या जमीन हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागला नाही. याविषयी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह जि.प.चे विरोधी पक्षनेते बंडू पाटील यांनी १ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी ११ ऑक्टोबर पर्यंत हा प्रश्न मार्गी लागला नाही तर धरणाच्या भिंतीवर आमरण उपोषण करू असा इशारा यावेळी त्यांनी दिला होता. ११ ऑक्टोबर पर्यंत सदरचा प्रश्न हा मार्गी न लागल्याने या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जिगाव प्रकल्पाचे भिंतीवर ११ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

आंदोलनात दिनकर पाचपोर, भगवान गाईत,सुनिल घाईट, पंडितराव घाईट, वासुदेव घाईट, उल्हास गई,तेजराव घाईट, लहू झाल्टे,भास्कर झाल्टे संतोष गवई विजय झाल्टे संतोष झाल्टे गोवर्धन झाल्टे, भाऊराव झल्टे, प्रशांत झाल्टे या शेतकरी मंडळींनी ११ ऑक्टोबर पासून जिगाव धरणाच्या भिंतीवर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणा दरम्यान कार्यकारी अभियंता राळेकर यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT