अकोला ः कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव (Increasing incidence of corona virus) पाहता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यात ९ मे च्या रात्री १२ वाजतापासून १५ मे च्या रात्री १२ वाजेपर्यंत कडक लॉकडाउनचे (टाळेबंदी) Strict lockdown आदेश जारी केले आहेत. त्यामुळे सोमवार (ता. १०) पासून जिल्ह्यातील सर्व किराणा, भाजी, फळ, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यपदार्थांची दुकाने बंद राहणार असून, सकाळी ७ ते ११ पर्यंत पार्सल सेवा सुरु राहणार आहे. परंतु हाॅटेल, रेस्टाॅरंट, शिवभाेजन थाळीची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यत सुरु राहणार आहे. बँक, पाेस्ट व वित्तीय सेवा बंद राहणार आहेत. Six days of strict lockdown from today
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनामार्फत विविध प्रकारच्या उपाययोजना सुद्धा करण्यात आल्या आहेत. परंतु त्यानंतर सुद्धा कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याने जिल्हा प्रशासनामार्फत आता संपूर्ण लॉकडाउनचे हत्यार उगारण्यात आले आहे. त्याअंतर्गत पुढील सहा दिवस जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेची दुकाने बंद राहणार आहेत. सरकारी कार्यालय, बॅंकांसह इतर वित्तीय संस्थांना सुद्धा पुढील सहा दिवस सुटी राहणार असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
घरपोच सेवा देता येणार
सहा दिवसांच्या टाळेबंदीच्या काळात जिल्ह्यातील सर्व किराणा, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पिठाची गिरणी इत्यादी दुकाने तसेच खाद्य पदार्थांची सर्व दुकाने (कोंबडी, मास , पोल्ट्री, मासे व अंडीयासह) सर्व मद्यगृहे, मद्यदुकाने व बार ही दुकाने पूर्णपणे बंद राहतील. सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी राहिल. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वत: जावुन खरेदी करता येणार नाही.
जिल्ह्याच्या सीमा सील
सर्व सार्वजनिक, खासगी बस वाहतूक, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहने यांची वाहतूक नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी राहणार आहे. जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करणार असून, माल वाहतूक व रुग्णांची वाहतूक करणाऱ्या वाहनास व शासकीय वाहनास जिल्ह्यात प्रवेश देणार आहे.
हे करणार अंमलबजावणी
लॉकडाउनच्या निर्देशांची काटेकारपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त महानगरपालिका, जिल्हा पोलिस अधीक्षक, महसूल विभाग तसेच ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबंधित नगर पालिका, नगर पंचायतींचे मुख्याधिकारी यांची राहिल. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार व पोलिस विभाग यांची राहिल, असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
संपादन - विवेक मेतकर
Six days of strict lockdown from today
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.