akola sakal
अकोला

वन कार्यालयात आदिवासींचा ठिय्या; विहिरीसाठी मागितली परवानगी

पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे दरवर्षी पाणी संकट भेडसावत असते.

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा चाळीस टापरी परिसरातील आदिवासींचे गेल्या 30 वर्षांपासून वास्तव्य आहे. परंतु, अशाही परिस्थिती त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे दरवर्षी पाणी संकट भेडसावत असते. दरम्यान, प्रशासनाच्या सततच्या दिरंगाई आणि आश्‍वासन धोरणाला कंटाळून जळगाव जामोद येथील वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या कार्यालयात काल संध्याकाळी 5 वाजेपासून ठिय्या आंदोलन सुरू केले. सदर आंदोलनात लहान मुलांसह महिलांचा समावेश असून, रात्री उशिरापर्यंत सदर आंदोलन सुरूच होते.

आदिवासी बहुल भाग असलेल्या चाळीस टापरी हे वनक्षेत्रात वसलेले गाव असून, येथे मुलभूत सुविधा आणि पाण्याची समस्या ही अनेक वर्षांपासून आहे. परंतु, या सर्व सोई उपलब्ध करून देण्यासाठी मुख्य म्हणजे वन विभागाची परवानगी आवश्यक आहे. येथील नागरिकांनी दरवर्षी भेडसावणारी पाणी समस्या लक्षात घेता श्रमदानातून विहीर खोदकाम गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी सुरू केले होते.

परंतु, काल सदर खोदकाम करत असताना महिला वनरक्षकाने हरकत घेत परवानगी आणा अन्यथा खोदकाम बंद करा असे सांगितले. यासंदर्भात वनरक्षक महिलेने जळगाव जामोद कार्यालयात बोलावून वरिष्ठांना माहिती देऊ असे सांगितले. यानंतर सर्व आदिवासी हे जळगाव जामोद कार्यालयात आले परंतु, येथील वनपरिक्षेत्र अधिकारी हे गायब असल्यामुळे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, रात्री 10 वाजता पोलिसांना पाचारण करण्यात आले असून, जिल्ह्यात 144 कलम लागू होणार असल्यामुळे जमावबंदी आदेशाचे पालन करण्याची सूचना देण्यात आली.

आरएफओ मुख्यलयी अनुपस्थितीत

जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी कटारिया हे मुख्यालयी नसल्याचे प्रकार सतत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. अशा परिस्थिती वरिष्ठ अधिकारी नसल्यामुळे आदिवासी बांधवांच्या प्रश्‍नांना समोर जाणार कोण असा सवाल होऊन उपस्थित वन कर्मचार्‍यांनी मनधरणी करण्याचे काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT