gold 
अर्थविश्व

कशी होती दिवाळी; कशी असेल दिवाळी?

अतुल सुळे

विक्रम संवत २०७६ नुकतेच संपले व २०७७ सुरू झाले. अशा वेळी गेल्या दिवाळीपासून या दिवाळीपर्यंत सोने, चांदी, शेअर्सनी कसा परतावा मिळवून दिला तसेच पुढील दिवाळीपर्यंत याच ‘ॲसेट क्लास’मधून किती परतावा मिळणे अपेक्षित आहे, हे समजून घेणे गुंतवणूकदारांसाठी हितावह ठरेल.

सोने - २०१९ च्या दिवाळीला सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव रु. ३८,६३० होता, जो या दिवाळीला रु. ५०,५३६ पर्यंत वाढला; म्हणजेच ३०.८२ टक्के परतावा! कोविड, जागतिक व्यापारयुद्ध, अमेरिकेतील निवडणुकीची अनिश्चितता, यामुळे भाव वाढले. तज्ज्ञांच्या मते, पुढील दिवाळीपर्यंत हाच ‘ट्रेंड’ चालू राहून सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव रु. ६०,००० पर्यंत जाऊ शकतो; म्हणजेच १८ ते २० टक्के परतावा अपेक्षित आहे.

चांदी - दिवाळी ते दिवाळी विचार केल्यास चांदीने सर्वाधिक परतावा दिला. गेल्या दिवाळीला एक किलो चांदीचा भाव रु. ४६,८२० होता, जो या दिवाळीला रु. ६२,७०४ वर गेला; म्हणजेच सुमारे ३४ टक्के परतावा! ऑगस्ट २०२० मध्ये हा भाव रु. ७८,००० पर्यंत वाढला होता. जागतिक अर्थव्यवस्था सुधारून औद्योगिक मागणी वाढल्यास चांदीचा भाव पुढील दिवाळीपर्यंत प्रत किलो रु. ८०,००० ते ८६,००० पर्यंत वाढू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

शेअर्स - गेल्या दिवाळीपासून ‘सेन्सेक्स’ सुमारे १० टक्के वाढला असला, तरी मार्च २०२० मध्ये ‘कोविड’च्या भीतीमुळे झालेल्या पडझडीत ज्यांनी खरेदी करायची हिंमत दाखविली, त्यांना ५० ते ६० टक्के परतावा मिळाला. पुढील दिवाळीपर्यंत हा निर्देशांक ४७,००० अंशांपर्यंत गेलेला असेल; म्हणजेच ८ टक्के वाढ होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मिडकॅप, स्मॉलकॅप कंपन्यांकडून उत्तम परताव्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT