अर्थविश्व

‘एसएमई’मुळे विकासाला चालना - सुरेश प्रभू

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - लघू आणि मध्यम उद्योग (एसएमई) क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. या क्षेत्राला पाठबळ मिळाले तर विकासात भरीव योगदान देण्याची क्षमता या क्षेत्रात असल्याचे मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. सोमवारी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘एसएमई’ मंचावर १०० व्या एसएमई कंपनीची नोंदणी प्रभू यांच्या हस्ते करण्यात आली. 

सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांमुळे लघू आणि मध्यम उद्योगांना चालना मिळाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा एसएमई मंच याच उपक्रमाचा एक भाग असल्याचे प्रभू यांनी सांगितले. ‘एसएमईं’ना भांडवल उभारणीसाठी एक व्यवहार्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने एसएमई ट्रेडिंग मंचाची उभारणी करण्यात आल्याचेही ते म्हणाले. 

सोमवारी एसएमई मंचावर एएनआय इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे पदार्पण झाले. या मंचामुळे उद्योन्मुख कंपन्यांमध्ये गुंतवणुकीसाठी इच्छुक असलेल्या गुंतवणूकदारांकडून इक्विटी भांडवल उभे करण्यास कंपन्यांना मदत करण्यात येत आहे. आतापर्यंत ग्राहकोपयोगी उत्पादने, कापड, औषध, खते, सेवा, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रातील १०० एसएमई कंपन्यांनी १४०० कोटींचे भांडवल उभारले आहे. कर्जाऊ भांडवल किंवा भाग भांडवल मिळविणे ही ‘एसएमईं’समोर समस्या होती. ही गरज ओळखून राष्ट्रीय शेअर बाजाराने एसएमई मंच विकसित केल्याचे एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम लिमये यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT