पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर हा पक्ष आता लोकसभा निवडणुकीसाठी समोरं जात आहे. पक्ष फुटीनंतर आता बरचंस पाणी पुलाखालून वाहून गेलंय. या पक्षफुटीबरोबरच पवार कुटुंबातही दुरावा निर्माण झाल्याचं चित्र सध्या आहे. त्यात बारामतीतून सुप्रिया सुळेंच्या विरोधात त्यांच्या भावजय सुनेत्रा पवार या मैदानात उतरल्या आहेत.
पण या लढतीकडं खुद्द शरद पवार कशा पद्धतीनं पाहतात. इथल्या निकाल कसा असेल? याचं उत्तरही त्यांनी दिलं आहे. (Sharad Pawar Speaks on How Baramati Loksabha Election 2024 Result will be out)
वरिष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी शरद पवार यांची नुकतीच मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवारांनी लोकांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. ६१ वर्षांचा राजकीय प्रवास केल्यानंतर मागे वळून पाहताना पवारांना नेमकं काय वाटतं? यावर ते म्हणतात, एका गोष्टीचा मला आनंद आहे की, राजकीय करिअरची ६० वर्षे झालीतरी माझं डोकं अद्याप जागेवर आहे. राज्यात नवी राजकीय पिढी निर्माण करण्याच्या दृष्टीनं मी विचार करतो आहे. (Latest Marathi News)
राष्ट्रीय पातळीवर योग्य संधी मिळाली की नाही?
क्षमता असूनही राष्ट्रीय पातळीवर योग्य संधी न मिळाल्याच्या प्रश्नावर पवार सांगतात, प्रत्येकाला संधी मिळतेच पण ती पूर्ण व्हावीच असं काही नाही. परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. आपल्या भागातील प्रश्न हे कधी विधीमंडळात मांडावेत, प्रशासनात जाऊन त्यावर काम करावं असं मला वाटायचं. त्यामुळं पुढे देशाचा संरक्षणमंत्री, कृषीमंत्री, विरोधीपक्ष नेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळं आणखी वेगळं काही मिळावं असं कधी वाटलं नाही. (Marathi Tajya Batmya)
अजित पवारांच्या टीकेवर भाष्य
पक्षाच्या फुटीनंतर अजित पवारांनी शरद पवारांवर टीका केली. यावर बोलताना शरद पवार म्हणतात, सुरुवातीपासूनच अजितदादांच्या जे मनात होतं तेच त्यांच्या तोंडी आहे. आज जरी ते सातत्यानं हे बोलत असले तरी त्यांना ही भूमिका खूप आधीच घ्यायची होती. पक्ष चालवताना अनेक गोष्टींकडं पाहावं लागतं. (Latest Maharashtra News)
सांगलीबाबत वेगळा विचार का केला?
चंद्रपूरबाबत जे केलं ते सांगलीबाबत का केलं नाही? या प्रश्नावर पवारांनी थेटपणे उत्तर दिलं. त्यांनी म्हटलं की, ठाकरेंच्या सहकाऱ्यांना आपण सांगितलं होतं की हा रस्ता योग्य नाही. कारण नेतृत्वानं जाहीर भूमिका घेतली की त्याला वेगळं वळण येतं, नेमकी तीच स्थिती आता सांगलीत तयार झाली आहे. (Latest Marathi News)
यंदाची निवडणूक वेगळी कशी?
गेल्या दोन टर्मपेक्षा यंदाची लोकसभा निवडणूक वेगळी असल्याचं शरद पवार सांगतात. ते म्हणतात, मोदी १० वर्षांच्या काळात त्यांची एक भूमिका होती. त्यांचा आत्मविश्वास होता तो आता दिसत नाही. ते जे बोलतात ते करत नाही असा लोकांचा समज झाला आहे. संविधानात दुरुस्ती वा तथाकथित परिवर्तनाचा विचार त्यांच्या डोक्यात आहे. मोदींच्या काळात हे होण्याचा संशय लोकांच्या मनात आहे.
बारामतीचा निकाल कसा असेल?
बारामती लोकसभेच्या निकालावर बोलताना शरद पवार म्हणतात, आजपर्यंत बारामतीत वेगळा निकाल लागलेला नाही. मी आणि माझ्या विचारधारेला त्यांनी पाठिंबा दिला. यावेळी काय निकाल येतो हे पाहावं लागेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.