Employment
Employment 
अर्थविश्व

असंघटित क्षेत्रावर केंद्राची नजर

पीटीआय

नवी दिल्ली - रोजगारांच्या विश्वसनीय आकड्यांशिवाय भारतीय अर्थव्यवस्थेचे कोडे सोडविणे हे महाकठीण काम असून, मोदी सरकारने ही त्रुटी दूर करण्यासाठी एक योजना तयार केली आहे. त्याअंतर्गत भारताचा वास्तविक विकासदर जाणून घेण्यासाठी असंघटित क्षेत्रातील रोजगारांविषयी रूपरेषा तयार केली जाणार आहे.

कामगार मंत्रालयाने या क्षेत्रातील रोजगाराची स्थिती दर्शविणारे तिमाही सर्वेक्षण सुरु केले असून, त्याची माहिती प्रसिद्ध  होत आहे. यात किमान १० कामगार असलेल्या आस्थापनांचाही समावेश आहे. आतापर्यंत रोजगाराबाबत विश्वासार्ह डेटा प्राप्त होत नसल्याने देशाचा नेमका विकासदर किती, याचे मूल्यमापन करणे अवघड जात होते. या क्षेत्रासाठी राबविली जाणारी धोरणे किती यशस्वी ठरली, हे पडताळणेही जिकिरीचे ठरत होते.

रोजगार समस्येचे भयाण वास्तव
देशात दरवर्षी १ कोटी २ लाख तरुण कार्यक्षेत्रात प्रवेश करण्यायोग्य होतात. जागतिक बॅंकेनुसार, भारताला दरवर्षी ८० लाख रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या लागतील. रेल्वेच्या ९० हजार जागांसाठी तब्बल २ कोटी ८० लाख तरुणांनी अर्ज केला होता. त्यात अभियांत्रिकी, तसेच वकिलीचे शिक्षण घेतलेल्यांचा असणारा समावेश देशातील रोजगार समस्येचे भयाण वास्तव अधोरेखित करतो.

सरकारकडून असंघटित क्षेत्रासाठी केला जाणारा हा पहिलाच सर्व्हे असून, याचा फायदा देशाला होईल. देशातील ९० टक्के कामगार या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे धोरणे तयार करताना अर्थव्यवस्थेत असणारे त्यांचे योगदान, तसेच त्यांचा सहभाग याकडे दुर्लक्ष होत होते.   
- बी. ए. नंदा, कामगार मंत्रालयाचे सल्लागार   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT