Bhishma Panchak 2022 esakal
संस्कृती

Bhishma Panchak 2022 : आजपासून सुरू झालं आहे भीष्म पंचक, ५ दिवस काय करू नये, जाणून घ्या

भीष्म पंचक व्रत ४ ते ८ नोव्हेंबर दरम्यान केलं जाणार आहे. या व्रताची पूजा आणि महत्व जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Bhishma Panchak Vrat 2022 : कार्तिकी एकादशी किंवा देवउठनी एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा भीष्म पंचक व्रत केलं जातं. असं मानलं जातं की, हे व्रत केल्यानं सर्व पाप कर्मांपासून मुक्ती मिळते. यंदा हे व्रत ४ ते ८ नोव्हेंबर पर्यंत करण्यात येणार आहे. हिंदू धर्मात याचं विशेष महत्व आहे.

भीष्म पंचक महत्व

धार्मिक मान्यतांनुसार चांगल्या इच्छांची पूर्ती करणारं हे व्रत आहे. हे व्रत स्वतः श्रीकृष्णाने केलं होतं असं सांगितलं जातं. महाभारताचं युध्द संपल्यावर भीष्म जेंव्हा मृत्यू शैय्येवर होते तेव्हा ते उत्तरायण सुरू होण्याची वाट पाहत होते.

हेही वाचा - राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

दरम्यान त्यांनी ५ दिवस राजधर्म, मोक्षधर्म, वर्णधर्म यावर महत्वपूर्ण उपदेश केला. या पाच दिवसांची स्मृती म्हणून हे भीष्मपंचक व्रत केलं जातं. असं म्हणतात की, जे हे व्रत मनापासून करतात त्यांना मोक्षप्राप्ती होते.

काय करावे, काय करू नये

  • पाच दिवस अखंड ज्योत लावावी

  • गीता वाचन करावं.

  • कार्तिक पौर्णिमेला संपूर्ण कुटुंबासह हवन करावं.

  • ब्राह्मण भोजन घालंव

  • गरीबांना यथाशक्ती अन्न, वस्त्र दान करावं.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, पोलिसांसोबत वाद

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT