Chanakya Niti in marathi esakal
संस्कृती

Chanakya Niti : या शब्दांमध्ये दडले आहे श्रीमंत होण्याचे रहस्य... तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे ना?

Chanakya Niti for Prosperity: कुणाला श्रीमंत व्हायचं नसतं? अगदी मिरवण्यासाठी असं नाही पण निदान आपल्या गरजा...

Lina Joshi

Chanakya Niti for Prosperity : कुणाला श्रीमंत व्हायचं नसतं? अगदी मिरवण्यासाठी असं नाही पण निदान आपल्या गरजा आणि मुलाच्या हौशी आपण पुरवू शकू इतकं तरी श्रीमंत प्रत्येकालाच व्हायचं असतं.

हे स्वप्न प्रत्येक माणूस बघतो आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक रात्रंदिवस मेहनत करतात. पण, मेहनतीचे फळ काही लोकांनाच मिळते आणि काहींच्या हाती निराशा येते.

कारण मेहनतीसोबतच पुढे जाण्यासाठी रणनीतीवरही काम करणे गरजेचे आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र 'चाणक्य नीती' मध्ये सांगितले आहे की, माणूस कठोर परिश्रमासोबतच जीवनशैलीत काही बदल करुन श्रीमंत होऊ शकतो.

अशा परिस्थितीत तुम्ही काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत कारण या गोष्टी आणि नियमच करोडपती बनण्याची दारे उघडतील.

१. कठोर परिश्रम

आचार्य चाणक्य म्हणतात की फक्त श्रीमंत होण्याचा विचार तुम्हाला श्रीमंत बनवू शकत नाही. यासाठी मेहनत आणि परिश्रम हे सुद्धा खूप महत्वाचे आहे आणि मेहनतीच्या जोरावर श्रीमंत झाल्यामुळे समाधान मिळते.

म्हणूनच कठोर परिश्रम करण्यास कधीही घाबरु नका. कारण मेहनत करणारी व्यक्ती कधीच निराश होत नाही. उलट तो आयुष्यात नक्कीच यश मिळवतो.

२. शिस्त पाळणे

आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, श्रीमंत होण्यासाठी व्यक्तीने आपल्या जीवनात शिस्त पाळली पाहिजे. शिस्तबद्ध जीवनशैली तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जाते.

म्हणूनच तुम्ही प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करा आणि दुसऱ्या दिवसासाठी कोणतेही काम सोडू नका. शिस्तप्रिय व्यक्तीला यशस्वी होण्यापासून काहीही रोखू शकत नाही.

३. जोखीम घेयला घाबरु नका

चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीने जीवनात कोणताही धोका पत्करण्यास घाबरु नये. जोखीम किंवा आव्हाने स्वीकारण्यास घाबरणारी व्यक्ती लाख प्रयत्न करुनही यशस्वी होऊ शकत नाही.

अशा व्यक्तीला देवी लक्ष्मीची कृपा कधीच मिळत नाही. म्हणूनच यश मिळविण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी, तुम्हाला जीवनात अनेक वेळा जोखीम पत्करावी लागेल आणि समोरच्या अनेक खडतर प्रसंगांना नक्कीच तोंड द्यावे लागेल.

४. सहकार्याची भावना

आचार्य चाणक्य म्हणतात की जीवनात तोच माणूस श्रीमंत होतो ज्याच्या मनात सर्वांना सोबत घेण्याची भावना असते. जो फक्त स्वतःचा विचार करतो त्याच्यासोबत लक्ष्मी देवी जास्त काळ टिकत नाही. म्हणूनच माणसात सहकार्याची भावना असली पाहिजे आणि सर्वांच्या हिताचा विचार करून निर्णय घ्यावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT