Kojagiri Purnima 2023 esakal
संस्कृती

Kojagiri Purnima 2023 : कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीचं असणार चंद्रग्रहण; ग्रहणकाळात ‘या’ गोष्टी करणे टाळा

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असणार आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Kojagiri Purnima 2023 : यंदा कोजागिरी पौर्णिमा ही २८ ऑक्टोबरला (शनिवारी) साजरी केली जाणार आहे. ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा आहे. विशेष म्हणजे या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असणार आहे. अश्विन महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला कोजागिरी किंवा शरद पौर्णिमा असे ही म्हटले जाते.

याच दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण भारतात ही पाहता येणार आहे. धार्मिकदृष्ट्या चंद्रग्रहणाला विशेष महत्व असते. चंद्रग्रहणाचा लोकांच्या आयुष्यावर चांगला आणि वाईट असे दोन्ही परिणाम होत असतात. हे खंडग्रास चंद्रग्रहण भारतात पाहता येणार आहे. विशेष म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा खंडग्रास चंद्रग्रहणाचा योग तब्बल ३० वर्षांनंतर आला आहे.

हे खंडग्रास चंद्रग्रहण किती वाजता सुरू होणार? आणि याचा सूतक कालावधी काय असणार? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

चंद्रग्रहण किती वाजता सुरू होणार ?

हे खंडग्रास चंद्रग्रहण २८ आणि २९ ऑक्टोबर असे दोन दिवस असणार आहे. शिवाय, हे ग्रहण आपल्याला भारतात पाहता येणार आहे. २०२३ मधील हे दुसरे आणि वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असणार आहे. कोजागिरी आणि चंद्रग्रहण असा योग कित्येक वर्षानंतर आला आहे, त्यामुळे, याचे खास महत्व आहे.

२८ ऑक्टोबरला शनिवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे चंद्रग्रहण मध्यरात्री १ वाजून ६ मिनिटांनी सुरू होणार आहे. त्यानंतर, मध्यरात्री २९ ऑक्टोबरला 02.22 वाजता हे चंद्रग्रहण संपणार आहे.

चंद्रग्रहणाचा सूतक काळ कधी ?

या खंडग्रास चंद्रग्रहणाचा सूतक कालावधी हा २८ ऑक्टोबरला दुपारी २ वाजून ५२ मिनिटांनी सुरू होणार असून हा कालावधी मध्यरात्री २ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे.

सूतक कालावधीपासून ते चंद्रग्रहण संपेपर्यंत कोणतेही शुभ कार्य करू नये असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्रग्रहण ही अतिशय अशुभ घटना मानली जाते.

चंद्रग्रहणा दरम्यान या गोष्टी करणे टाळा :

  • ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्रग्रहण हे अशुभ मानले जाते.

  • शास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या सूतक काळात देवाच्या मूर्तीला स्पर्श करणे, खाणे, झोपणे आणि नखे कापणे हे निषिद्ध मानले जाते.

  • ग्रहणकाळात तयार केलेले अन्न, कापलेल्या भाज्या आणि फळे दूषित होतात. त्यामुळे, या गोष्टींचा वापर करू नये.

  • ग्रहणकाळात महिलांनी गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये आणि तीक्ष्ण वस्तूंचा वापर करू नये असे सांगितले जाते.

  • चंद्रग्रहणाच्या दरम्यान शिळे अन्न खाऊ नये असे ही सांगितले जाते.

  • शिवाय, या काळात देवाची ध्यानधारणा करावी. मंत्रजाप करावे असे ही म्हटले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT