Pitru Paksh  esakal
संस्कृती

Pitru Paksh : निवृत्त पोलिसाने आई-वडीलांच्या आठवणीत बांधले मंदिर ; सर्वत्र होतेय कौतुक!

कलियुगातील श्रावणबाळ चर्चेत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जगातील वृद्धाश्रमांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली जाते. काम संपले की वस्तू फेकून दिल्या जातात. असेच वय झालं की आई-वडील घरात नाही तर वृद्धाश्रमात सापडतात. नोकरीसाठी शहरात रहायचं म्हणून आलेले लोक तिथेच सेटल होतात. मात्र, आई बाबांना विसरून जातात. हे असे चित्र असताना कलियुगातील श्रावणबाळ चर्चेत आला आहे. या श्रावणबाळाने आई-वडीलांची सेवा तर केलीच. त्याचसोबत त्यांच्या मृत्यु पश्चात त्यांचे मंदिरही बांधले.

तामिळनाडुमधील मदुराईत रहात असलेले रिटायर्ड पोलिस उपनिरीक्षक रमेश बाबू यांनी त्यांच्या आई-वडीलांचे मंदिर बांधले आहे. ते आई-वडीलांची रोज पूजाही करतात. यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

याबद्दल रमेश असे सांगतात की, पोलिसाची नोकरी म्हणजे २४ तास ड्युटी. कामामुळे मला माझ्या कुटूंबाला कमी वेळ देता आला. माझ्या आई-वडीलांची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले नाही. मी नोकरीवर असतानाच माझ्या आई-वडीलांचे निधन झाले. त्यामुळे रिटायर्ड झाल्यावर आई-वडीलांचे मंदिर बांधण्याचा मानस मी केला.

आई-वडीलांप्रती असलेली श्रद्धा काही पहील्यांदाच चर्चेत आली नाही. तर याआधी सांगली जिल्ह्यात एका मुलाने आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची आठवण रहावी यासाठी सिलिकॉनचा पुतळा बनवला होता. त्याचे वडील पोलिसात होते त्यामुळे त्याने खाकी गणवेशातच वडीलांचा पुतळा बनवला.

काही दिवसांपूर्वी एका तरूणीच्या लग्नात तिच्या भावाने वडिलांचा मेणाचा पुतळा बनवला होता. त्या मुलीसाठी हा खूप भावूक क्षण होता. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

सायबर फ्रॉडपासून बचावासाठी ‘ही’ पंचसूत्री लक्षात ठेवाच! अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर रिकामे होईल बॅंक खाते; सोलापूर शहर सायबर पोलिस म्हणतात...

Uddhav Thackeray Statement : ''मुंबईत अ‍ॅनाकोंडा येऊन गेला अन् भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची'' ; उद्धव ठाकरेंचं विधान!

SCROLL FOR NEXT