प्रत्येकच महिन्यात काही तरी व्रत-वैकल्ये अन् धार्मिक दिवस असतात. पण यंदा अधिकमास आल्याने सणवार एक महिना पुढे सरकले आहे. आता जुलै संपून ऑगस्ट महिना लागत आहे. यात ऑगस्टमध्येच अधिकमास संपून श्रावणही सुरु होणार आहे. त्यामुळे श्रावणापासून लागोपाठ येणाऱ्या सणावारांची आणि व्रत वैकल्याच्या खास दिवसांची सुरुवात याच महिन्यात होणार आहे.
त्यामुळेच ऑगस्टमध्ये येणार धर्मिक विशेष दिवस, सणवार आणि खास दिवस कोणते आणि कधी जाणून घेऊया.
दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येत असते. पण गणेश भक्तांसाठी त्याला कायमच विशेष महत्व असते. या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास ठेवून रात्री चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो. या दिवशी गणपतीच्या आराधनेला फार महत्व असते. ऑगस्ट महिन्यांत संकष्टी चतुर्थी दि. ४ ऑगस्ट रोजी अधिक श्रावणातली संकष्टी चतुर्थी येणार आहे.
शनिवार १२ ऑगस्टला अधिकमासाच्या शुक्ल पक्षातली एकादशी असून या एकादशीला कालनिर्णयमध्ये पुरुषोत्तम आणि कमला एकादशी म्हणण्यात आले आहे. पुरुषोत्तम हे श्री विष्णूंचे नाव आहे. तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या या एकादशीचे महत्व इतर एकादशींपेक्षा कितीतरी पटीने अधिक सांगितले आहे. एकादशीच्या व्रताचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे.
ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशीप डे साजरा करण्यात येतो. यंदा हा दिवस ६ ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे.
मंगळवारी १५ ऑगस्टला अमावस्या आहे. याच दिवशी भारतातचा स्वातंत्र्य दिन आणि पतेती आहे. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून भारत स्वतंत्र झाला.
तसेच पारशी समादाचे नववर्ष असणारा पतेती हा सणही याच दिवशी आहे.
सोमवार २१ ऑगस्टला निज श्रावण शुक्ल पंचमी आहे. पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आहेत. श्रावण महिन्यात शंकराच्या उपासनेला विशेष महत्व असते. श्रावण महिन्यात रोजच काहीना काही व्रतवैकल्य आणि देवता पूजेचं महत्व आहे.
नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला सण म्हटला जातो. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करण्याची परंपरा आहे.
श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते. या वर्षी रविवार २७ ऑगस्टला पुत्रदा एकादशी साजरी करण्यात येणार आहे. या एकादशीचे महात्म्य ऐकून व्यक्ती सर्व पापांतून मुक्त होतो आणि जिवंत असे पर्यंत सुख समृद्धी आणि मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो अशी मान्यता आहे. पुत्रप्राप्ती व्हावी या हेतून या दिवशी विष्णू पूजेचेही महत्व सांगितले जाते.
श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी समुद्राला श्रीफळ अर्फण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्याचप्रमाणे श्रावण पौर्णिमा ही राखी पौर्मिमा म्हणजेच रक्षाबंधन म्हणूनही साजरी केली जाते. हा सण खास भाऊ-बहिणींचा असतो. यंदा रक्षाबंधन ३० ऑगस्टला आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.