12 die in UP after drinking spurious liquor
12 die in UP after drinking spurious liquor  
देश

उत्तर प्रदेशात विषारी दारूमुळे 12 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था

बाराबंकी (उत्तर प्रदेश): बाराबांकी जिल्ह्यातील रामनगर गावामध्ये विषारी दारू प्यायल्याने 12 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण अस्वस्थ आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर गावामध्ये विषारी दारू प्यायल्यामुले 12 जणांचा मृत्यू झाला आहे. 24 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. गावातील सरकारमान्य दुकान असलेल्या दुकानामधून त्यांनी दारू खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे. दारू प्यायल्यानंतर अनेकांची दृष्टी गेली. तसेच इतरही त्रास सुरू झाले. मात्र उपचारादरम्यान विषारी दारूमुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱयांसह अनेकजण गावामध्ये दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत.

एकाच कुटुंबातील पिता व तीन मुलांचा मृत्यू झाल्यामुळे घरात कर्ते पुरुषच राहिले नाही. एकाचवेळी चौघांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबातील महिलांवर आली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात 21 फेब्रुवारी रोजी विषारी दारू प्यायल्याने 127 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विषारी दारू प्यायल्याने यापूर्वी 92 जणांचा मृत्यू झाला आहे. सहारनपूरमध्ये 64, रुरकीमध्ये 20 आणि कुशीनगरमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT