'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi astrologer predicted: 'एका ज्योतिषाने माझा हात पाहिला होता आणि त्याने महत्त्वाची घोषणा केली होती- प्रियांका गांधी
Priyanka Gandhi
Priyanka Gandhi

नवी दिल्ली- काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी यांनी 'आज तक'या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एक रंजक किस्सा सांगितला आहे. त्यांनी सांगितलं की, 'एका ज्योतिषाने माझा हात पाहिला होता आणि त्याने महत्त्वाची घोषणा केली होती. मी एक दिवस पंतप्रधान होईल असं त्याने सांगितलं होतं.'

प्रियांका गांधी म्हणाल्या की, मी १२-१३ वर्षांची असेन. एक ज्योतिषी आमच्या घरी आले होते. ते वडिलांची वाट पाहात होते. ते पॉलिटिकल टाईप ज्योतिषी होते. ते आले तेव्हा मी तिथून जात होते. त्यांनी मला बोलावलं अन् माझा हात पाहिला. ते म्हणाले की मोठी होऊन तू पंतप्रधान होणार. जेव्हा वडिलांनी हे सर्व ऐकलं तेव्हा त्यांनी मला रागावलं. ते म्हणाले की, 'तू काय करत आहेत. अशा प्रकारच्या गोष्टी तुझ्या मनामध्ये कधीही यायला नको.'

Priyanka Gandhi
Priyanka Gandhi : ''माझ्या आजीला, वडिलांना तुम्ही देशद्रोही म्हणणार, मग...'' प्रियांका गांधींचा भाजपवर हल्ला

'काँग्रेसचा जर तिसऱ्यांदा पराभव झाला तर नेहरु-गांधी परिवाराला हटावं लागेल आणि नवीन चेहरा द्यावा लागेल असं म्हटलं जात आहे', असा प्रश्न पत्रकाराने त्यांना विचारला होता. यावर गांधी म्हणाल्या की, काहींनी नेहरु-गांधी अशी धारणा बनवली आहे. आम्ही असा विचार करत नाही. आम्ही नेहरु-गांधी कुटुंबाचे आहोत, म्हणून आम्ही सत्तेत राहावं अशा पद्धतीने आम्हाला वाढवण्यात आलं नाही. मीपण माझ्या मुलांना असं काही शिकवलं नाही. आम्हाला पंतप्रधान होण्यासाठी किंवा कोणत्या पदावर राहण्यासाठी बळजबरी देखील करण्यात आलेली नाही.

Priyanka Gandhi
Nandurbar News : ‘त्यांचा’ आवाज गुंजला प्रियांका गांधींच्या सभेत; अविनाश मराठे यांना नंदुरबारच्या सभेत सूत्रसंचालनाची संधी

आमच्या कुटुंबाकडेच सत्ता पाहिजे अशी जी धारणा बनवण्यात आली आहे ती खोटी आहे. आम्ही राज्य केलंय, त्यामुळे आम्ही स्वत:ला महाराज्याप्रमाणे समजतो, हे सगळं बकवास आहे. तुम्ही कधी माझ्या घरी या. आम्ही महाराजाप्रमाणे राहतो का? ते पाहा. आम्ही साधारण आयुष्य जगतो. सत्ता मिळवण्याची धारणा आम्ही ठेवलेली नाही किंवा आम्हाला सत्तेला चिटकून राहायचंय असाही विषय नाही. आम्ही असा विचार करत नाही, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

दरम्यान, २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहेत. २० तारखेलाच उत्तर प्रदेशातील रायबरेली, अमेठीमध्ये मतदान होणार आहे. हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेससाठी महत्त्वाचे मानले जातात. रायबरेलीतून राहुल गांधी मैदानात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com