देश

देशातील 293 धरणांची उलटली शंभरी 

पीटीआय

नवी दिल्ली -  देशातील सुमारे 293 मोठ्या धरणांची शंभरी उलटलेली आहे, अशी माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सोमवारी लोकसभेत दिली. धरण सुरक्षेवरील विधेयक त्यांनी आज सभागृहात मांडले. 

धरणांच्या दुर्घटना टाळण्यासाठी धरण सुरक्षेसाठी राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणाबरोबरच राष्ट्रीय समिती स्थापन करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. या विधेयकानुसार धरण सुरक्षेसाठीच्या निकषांकडे लक्ष देईल, तसेच धरणाच्या संरक्षणासाठी धोरण निश्‍चित करेल, असे सांगण्यात आले. शेखावत म्हणाले, ""भारतात पाच हजार 344 मोठी धरणे आहेत. त्यापैकी 293 धरणे ही 100 वर्षांपूर्वीची आहेत. यातील एक हजार 41 किंवा 20 टक्के धरणे ही 50 ते 100 वर्षांची आहेत. देशातील 92 टक्के धरणे ही आंतरराज्य नद्यांवर बांधलेली आहेत.'' 

राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरण हे धरणांवर योग्य देखरेख ठेवण्यासाठी धोरण आखणे, नियमावली व निकष ठरविणे, विशिष्ट धरणांची देखभाल व दुरुस्ती करणे आदींची नियामक संस्था आहे. दोन राज्यांमधील राज्य धरण सुरक्षा संघटनांमधील समस्यांवर मार्ग काढण्याची जबाबदारीही या संस्थेची आहे. धरण सुरक्षा विधेयक हे 2018मध्ये लोकसभेत सादर झाले होते. मात्र, संसद विसर्जित करण्यात आल्याने ते प्रलंबित होते. 

धरणांचे वयोमान 

5,344   - एकूण मोठी धरणे 

293  - 100 वर्षांपेक्षा जुनी 

1,041  - 50 ते 100 वर्षांची 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG Live Score : केएलनं नाणेफेक जिंकली; तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

SCROLL FOR NEXT